Showing posts with label maharashtra. Show all posts
Showing posts with label maharashtra. Show all posts

Thursday, 5 January 2017

आर्थिक नियोजन




ता. २ जानेवारी २०१७. सर्व प्रथम माझ्या सर्व वाचक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घना व राधा या नवविवाहित जोड्याची गोष्ट सांगणार आहे. जानेवारी ते मार्च हा साधारणपणे प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाचे महिने. याचे महिन्यात तुमचे कामाचे मुल्यांकन करून तुमची पगार वाढ ठरणार असते. आज घनाची त्याच्या बॉस बरोबर चर्चा असते. बराच वेळ चर्चा झाल्यावर घना बॉस च्या केबिन मधून नाचतच बाहेर आला. ताबडतोब राधाला एक SMS पाठवला. आपण ठरल्याप्रमाणे ४१” LED च्या हप्त्याची सोय झाली बर का? १ एप्रिल पासून माझा पगार रु. ५,०००/- ने वाढला. राधा ने पण लगेच उत्तर पाठवले, अभिनंद मग आज कोणत्या हॉटेल मध्ये पार्टी देणार.

असा चित्र जवळ जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

१ एप्रिल, घना व राधा एकदम खुश. ४१” LED घरी आणतो. दोघेही आनंदात चहा घेत LED पाहत या नवीन वस्तूचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात त्याची ५ वर्षा ची मुलगी त्यांच्या जवळ येते. आता संपूर्ण परिवार LED समोर असताना, काही केल्याने घनाला आनंद मिळत नसतो. एक प्रकाची अनामिक भीती त्याच्या मनात असते. पण काय ह्याचा उलगडा मात्र होत नाही. आपल्या नियोजन मध्ये काही तरी चुकतंय याची खात्री होते. पण काय चुकतंय हेच कळत नाही. शेवटी घना LED सोडून आपल्या रूम मध्ये जातो व शांतपणे विचार करू लागतो. पण विचारांना दिशा मिळत नाही व मन अधिकच अवस्थ होते. काहीच सुचत नाही.. कोणतीच दिशा मिळत नाही.. म्हणून घना उठतो व उद्या ऑफिस काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो. त्याला आठवते कि, आपल्याला परवा ऑफिसच्या कामासाठी मुंबई ला जायचे आहे व आपल्याला डेक्कन क़्विन चे आरक्षण करणे आवश्यक आहे. घना पटकन उठून बाहेर जायच्या तयारीला लागतो आणि अचानक त्याचे डोळे चमकतात. आरेच्या... मी मघापासून ज्यासाठी अस्वथ होतो ते तर खूपच सोप्प आहे. जसं मी माझ्या ऑफिस च्या कामाचे नियोजन करतो तसेच मला माझ्या भविष्यात येणाऱ्या गरजांसाठी “आर्थिक” नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काय आहेत व त्यासाठी काय करायचे याचा विचार करू लागतो.

घनाचे मन थोडा हलक होते. आता विचारांना थोडी दिशा मिळते. त्याला आता काय करायचे आहे याबद्दल सुचू लागते.

आज जी काही घनाची मानसिक अवस्था आहे. ह्या अवस्थे बद्दल या पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला माहित आहे. पण त्या अवस्थेवर विचार न केल्यामुळे बऱ्याच लोकांना यावर उपाय सुचत नाही.  यावर उपाय म्हणजे, ‘वयक्तिक वित्त नियोजन” म्हणजेच “Personal Financial Planning”

घनाला या विषयाबद्दल जेव्हा समज येते तेव्हा घना जरा घाबरूनच जातो. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वित्त नियोजन म्हणजे नेमके काय ? पण पैश्याचे नियोजन करायचे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे हवे, माझ्या तुटपुंज्या पगार मध्ये कसलं नियोजन न काय? नियोजन करून घेण्यासाठी कोणाकडे जायचे ? नियोजन करणारा खूप पैसे घेईल का ? इत्यादी...

असे अनेक प्रश्नांचे ओझे घनाला मनावर यायला लागते. अशाच अवस्थेत तो बाहेर पडतो. मी, तुम्ही, आणि आपल्या सर्वांनसाठी “Personal Financial Planning” म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ततपूर्वी आपण श्री. बुफेत  यांची काही कमाई, खर्च, बचत यावर काही मार्ग दर्शन तत्त्वे आहेत, त्या बद्दल आपण जाणून घेऊ. श्री. बुफेत म्हणतात:-

१.      आपण कधीही एकाच कमाई वर अवलंबून राहू नये. आपण अशा प्रकारे गुंतवणूक करावी कि त्यातून आपल्याला नवीन उत्पन्न सुरु होईल.

२.      खर्चाच्या बाबतीत श्री. बुफेत म्हणतात कि, जर आपण आपल्याला गरज नसेलेली वस्तू विकत घेतली तर, लवकरच आपल्याला गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील.

३.      बचतीचे समीकरण खालील प्रमाणे: कमाई – बचत = खर्च

पण कमाई- खर्च = बचत असे असू नये.



श्री. बुफेत यांची तत्त्वे एकल्या नंतर घनाला ऐकेक प्रश्नाचा उलगडा होऊ लागला. घनाला आपण करत असलेल्या चुका लक्षात येऊ लागतात. कळून चुकते कि, LED चा आतातायी निर्णय घेतल्यामुळे विनाकारण वयक्तिक बोझा वाढून ठेवला आहे. पण तरी सुद्धा “Personal Financial Planning” म्हणजे काय याचा उलगडा होत नाही. बचत करावी लागेल, बचत करून गुंतवणूक केली पाहिजे, या गुंतवणीकीतून नवीन उत्पन्न झाले पाहिजे. पण नेमके किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल काही कल्पना आली नाही.

घनाच्या या प्रश्नांबद्दल आपण थोडे विचार करू वरील सर्व प्रश्न पाहता आपल्याला हे लक्षात येईल कि, “घनाला नक्की काय हवं आहे हेच कळत नाही,” त्याची आयुष्यातील नेमकी काय उधिष्ट आहेत हेच त्याला माहित नाही. चला तर आपण या गोष्टी समझुन घेण्यासाठी चार महत्वाचे प्रश्न बद्दल चर्चा करू. या चार प्रश्नाची उत्तरे देताना/ लिहताना आपण आपल्याला घनाला काय हवे आहे याचा नेमका उलगडा होईल,हे सर्व प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचे आहेत.

प्रश्न १. आज पासून माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत (म्हणजे वय वर्ष ७५/८० पर्यंत) अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत व त्यामुळे मी आनंदी राहीन.



प्रश्न २. या सर्व गोष्टी मला त्या त्या वेळेत सध्या करायच्या असतील तर अशा कोणत्या अडचणी आहेत ज्यांना मला सामोरे जायचे आहे.



प्रश्न ३. अश्या कोणत्या उत्कृष्ट संधी मला साधायच्या आहेत ज्यावर मला १००% लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याजवळ पकडून ठेवायच्या आहेत.



प्रश्न ४. माझ्या मध्ये असे कोणते गुण आहेत ज्यावर मला आणखी काम करायचे आहे व या सर्व उद्धिष्ट पर्यंत पोहचण्यासाठी अशी कोणती Skill & Resourse वर काम करायचे आहे जे माझ्या कडे आज नाहीत.

या चार प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या मनाप्रमाणे, प्रामाणिकपणे जर लिहिली तर आपली मानसिक अवस्था एकदम उच्च दर्ज्याची होईल. आपल्याला नेमके हे कळून जाईल कि,मला कोठे जायचे आहे. जेथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी मला काय करायचे आहे आणि त्यासाठी किती वेळ आहे.  आजचा लेख जरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित असला तरीही बहुतांश व्यावसायिक व शेतकरी मित्र याच मानसिकते मधून जातात. किंबहुना प्रत्येक व्यावसायिक व शेतकरी मित्राला यांच्या पैशाच्या नियोजना बाबतीत घना पेक्षा जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे. तेव्हा मित्रांनो माझ्या पुढील लेखापर्यंत सर्वांची वरील चार प्रश्नांची स्वतः साठीची उत्तरे तयार करून ठेवा. आपण या विषयी सविस्तर बोलणारा आहोत. आज जर तुम्ही तयारी केलीत तर पुढील वाटचालीत त्याचा पूर्ण उपयोग करून घेता येईल.

Monday, 12 December 2016

“शब्दांचे अस्त्र व आर्थिक यश”



हल्लीच, म्हणजे १ आठवड्यापूर्वी दसरा सण होऊन गेला. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे अपराजिता देवीची मनोभावे स्थापना करून आर्थिक यशासाठी आशीर्वाद मागितला असेलच. आता हे नक्की काय याचाच विचार करताय ना? थोडक्यात सांगायचे म्हणजे अ-पराजित. पराभव न होणारा. आर्थिक बाबींवर विजय मिळवणारा विचार. दसरा हा सणच मुळात नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवण्याचा. म्हणून या दिवशी रावणाचा वध केला जातो. लंकापती रावण तर रामाने कधीच मारला आहे. पण शेतमालाचे पडणारा भाव व शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा रावण अजून जिवंत आहे. त्याचा अंत होणे आवश्यक आहे. ज्या दिवशी बळीराजा जागृक होईल व त्या रावणाचा अंत करेल तोच दिवस हा दसरा-दिवाळी असेल.

आता हा नवीन रावण कोण आणि त्याला कसे शोधायचा ? आहो मंडळी, त्याला कुठे शोधायची गरज नाही. तो तुमच्या मानत आहे. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे, पैश्याच्या प्रती नकारात्मक विचार खोडून टाकले कि आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल. पण हे नकारात्मक विचार कोणते आणि ते कसे तयार होतात यावर जरा सविस्तर विचार करू. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, तो जे काही ऐकतो, पाहतो आणि त्याच्या बाबतीत काय काय घटना घडतात, यावर त्याची विचारसरणी तयार होत असते. जेव्हा या वरून पैश्याचे विचार घडतात, त्यालाच मी Money Blueprint म्हणतो. या तीन महत्वांच्या बाबींमधील आज, “ऐकणे किंवा शाब्दिक माऱ्यामुळे काय होते ते पाहूया.
आज आपण प्रत्येकजण आपल्या बालपणात जाऊया. जर हे वाचत असताना तुम्ही शालेय विध्यार्थी असाल, तर तुम्हाला आजूबाजूला पैश्याबद्दल काय काय ऐकु येतय ते जरा जवळून बघू. त्या सर्व विचारांपैकी खालील काही वाक्य :-

१.      पैसा हेच साऱ्या वाईटांचे मूळ आहे.
२.      पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.
३.      प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकत नाही.
४.      पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहे.
५.      पैसा काही झाडाला लागत नाही.
६.      आपल्याला परवडणार नाही.

आता तुम्ही विचार करत असाल कि, “असे नुसते विचार करून कधी श्रीमंत अथवा गरीब कसे होईल.” पण माझ्या शेतकरी बांधवांनो, “पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहेच. पण त्याला आर्थिक जोड मिळाली तर काय प्रॉब्लेम आहे का ?” पण मनाच्या श्रीमंती मधेच अडकून जातो व नेहमी म्हणत राहतो कि, “तुम्ही एकाच वेळेस श्रीमंत व धार्मिक राहूच शकत नाही.” याच मध्ये जर धार्मिक राहायचे असेल किंवा मनाने श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसा बाधक आहे. त्यामुळे नकळत पैश्यापासून आपण लांब जात राहतो. याच मुळे ३-४ महिने, कधी कधी वर्षभर मेहणतीने पिकवलेला शेत माल हा दुसऱ्याच्या ताब्यात देतो. म्हणजे काय, “जेव्हा पैसा तुमच्या पैसा खिशात यायची वेळ झालेली असते तेव्हा आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो.” पण तुम्ही जे काही करत आहात याला, तुमचा काहीच दोष नाही. कारण अनेक वर्ष तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी असेच सांगताना ऐकले आहे. आपले काम शेती करणे. एवढे करून आपण विक्री कशी करणार. हेच तुमच्या मनावर घट्ट रुतून राज्य करत आहे. इथे दोन गोष्टी आहेत. मनावर रुतून राज्य करणाऱ्या भावना व खरच गरज असणारा तर्क विचार. या मध्ये जर कोणाची निवड करायची झाली तर भावनेचाच नेहमी विजय होतो. मग याच भावनांचे भांडवल करून कोणीतरी तुमच्या वर राज्य करतो. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि मग माझ्या शेतकरी बांधावा प्रती सहानुभूती दाखवली जाते.

मित्रांनो एकदाका तुम्ही “सहानुभूतीच्या” चक्रव्युहात अडकला कि नेहमी तेच आवडते आणि तुम्हाला नक्की काय पाहिजे याचा तर्क विचार कधीच करत नाही. म्हणजेच काय कि, तुम्ही जिथे आहात तिथेच योग्य आहात हे दररोज सहानुभूतीच्या माध्यमातून पटवून दिले जाते. पण दुसरे मन चांगला भाव मिळून जरा जास्त पैसे मिळाले तर किती बरे, होईल या मध्ये अडकले असते. शेवटी सहानुभूतीच बरी वाटते कारण ती सवायीची असते.

तेव्हा मित्रांनो, आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल कि तुमचे आर्थिक वाटोळे करणारा रावण कोण आहे? मागील लेखात सांगितल्या प्रमाणे परत इथे लिहू इच्छितो कि, “तुमच्या मनात तुमच्या सवयीच विचार ठरवतात, तुमचे विचार निर्णय घेतात. निर्णय कृती ठरवतात आणि त्या नुसार तुम्हाला त्याचे फळ मिळते.” इतकी वर्ष जे काही तुम्ही ऐकत आला आहात त्या वरूनच तुमचा आर्थिक आराखडा तयार झालेला आहे. तुमचे आर्थिक बाबतीत जे काही यश अपयश आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. जर पैश्याच्या विवंचनेतून बाहेर पडायचे असेल, किंवा आर्थिक यश मिळायचे असेल तर “ही जबाबदारी तुमची तुम्हाला स्वीकारली पाहिजे”. एकदा तुम्ही ही जबाबदारी स्वच्छेने स्वीकारली कि आयुष्य आपोआप बदलायला लागेल. आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतील. ही जबाबदारी जर सक्षम पणे पेलायची असेल तर खालील गोष्टी करा:-

१.      वरील नमूद पैश्याबद्द्लच्या नकारात्मक गोष्टी लिहून काढा.
२.      ही विचार पद्धती कोठून तयार झाली याचा विचार करा.
३.      जर ती विचार पद्धती तुमच्या आर्थिक प्रगतीला मारक असेल तर त्या पासून बाजूला व्हा.
वरील गोष्टी करत असताना तुम्ही आर्थिक बाबींमध्ये कुठे आहात आणि तुम्हाला कोठे जायचे आहे.

 (तुमचे आर्थिक यश म्हणजे काय?) याचा विचार करा. “कोठे जायचे आहे हे जो पर्यंत ठरवणार नाही, तो पर्यंत कस जायचे हे कसे समजेल.?


आज इथेच थांबू. पुढील भागात पैश्यांच्या अवती-भोवती तुम्ही जे काही पाहत आला आहात व त्यांचा तुमच्या आयुष्यवर कसा परिणाम होतो हे पुढील भागात पाहू.

Sunday, 11 December 2016

नकारात्मक विचार खोडा


सर्व प्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा...नवरात्री हा सण नऊ रात्री आदिशक्तीची आराधना करण्याची आहे. पावसाळा बहुतेक संपलेला आहे, शेतातली पिके तयार होत आलेली आहेत. काही तर तयार झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी मंडळी खुशीत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते व त्या दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंडला खेळला जातो. यामध्ये घागर फुंकणे हा एक प्रचलित खेळ. इतकी वर्ष हा खेळ खेळला जातो, पण तो का खेळला जातो यावर आपण कधीच चर्चा करत नाही. थोडे शोधल्यावर असे वाचनात आले कि, “अष्टमीला घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.” ही गोष्ट आपण अनेक वर्ष पाहत आलो आहे व त्याचप्रमाणे अनुकरण ही करीत आलो आहे. पण असे करण्याने श्वसन मार्ग शुद्ध होतो. हे वाचले तेव्हा ही गोष्ट लक्षात आली कि अश्या अनेक गोष्टी आहे ज्या गोष्टी आपण सहजपणे; त्याचा उपयोग काय आहे हे न समझुन घेता स्वीकारतो आणि निसंकोच पणे पुढच्या पिढीला देतो.

अश्याच प्रकारे पैश्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनावर कोरले गेलेले असतात. ते विचार तुमच्यासाठी फायदा देणारे आहेत कि तोटा ह्याचा विचार आपण करत नाही. कारण तो विचार आपल्या पूर्वजांनी/ वरिष्ठांनी दिलेला असतो व तो विचार चुकीचा असूच शकत नाही हे आपण आपल्या मनाला ठामपणे सांगितेले असते. आता या ठकाणी, “आडातच नाही  तर पोहणाऱ्या कुठून येणार” ही म्हण तंतोतन खरी ठरते.

माझ्या मागील लेखामध्ये किंवा माझ्या प्रत्येक व्याखानामध्ये मी नेहमी सांगत असतो कि, “ज्या गोष्टीवर अथवा घटनेवर तुम्ही लक्ष्य केंद्रित करता, ती गोष्ट अथवा घटना तुमच्या मनाप्रमाणे होते. आपण अगदी लहानपणा पासून काचेच्या भिंगाणे काडेपेटी मधील काडी जाळण्याचा खेळ खेळलाच आहे. कोणी हा खेळ खेळला नाही तर नवलच म्हणावे लागेल. आपण हा खेळ खेळताना आपल्या आजूबाजूला वरिष्ठ मंडळींनी सांगितले कि त्या भिंगातून बाहेर पडणारा सूर्यप्रकाश जर काडीचा बिंदू जिथे ज्वलन पदार्थ (sulphar) असतो, त्याठिकाणी केंद्रित झाला नाही तर तो ज्वलन पदार्थ पेट घेणार नाही. यासाठी तुम्हाला हात न हलवता पूर्ण एकाग्र मनाने तुमच्या हातातील भिंगाणे त्या काडीवर सूर्यप्रकाश पाडावा लागेल व ते तुम्ही नक्कीच केले असेल. जरा जरी मन विचलित झाले तरी सुद्धा आपले उद्धिष्ट सध्या होत नाही.

तसेच तुम्ही जर पैसेवाल्या (श्रीमंत) माणसांप्रती मनात घृणा बाळगत असला व त्याच बरोबर “मी चांगला माणूस बनणार आहे” हे म्हणत असाल तर, तुमच्या मनावर “चांगला माणूस कधीही पैसेवाला नसतो, ही गोष्ट बिंबलेली असते.” मग मला सांगा तुमच्याकडे पैसा येईल का? आणि आलाच तर तुमचेच मन तुम्हाला सांगेल कि. “ मला तर चांगला माणूस व्हायचे आहे. त्यामुळे हा पैसा खर्च करून टाकू.” पण आपण आजूबाजूला पाहीले तर आशा अनेक व्यक्ती आहेत कि जे पैसेवाले (श्रीमंत) आहेत आणि चांगले पण आहेत. पण याचा आपण विचार करत नाही कारण असा विचार करायचा असतो हे आपल्याला माहितीच नसते.

असे पैश्याबाद्द्लचे अनेक नकारत्मक विचार हे प्रत्येकाच्या मनात ठासून भरलेले असतात. यालाच मागील लेखात म्हणल्या प्रमाणे programming असे म्हणतात. आता ह्या सर्व पैश्याबाद्द्लच्या नकारत्मक गोष्टी ज्या मनावर कोरल्यागेलेल्या आहेत त्यातूनच विचार येतात. इतकी वर्ष तुमच्या पैश्याबाद्द्लच्या विचाराने तुम्ही कार्य करत आला आहात. आज प्रत्येकाची जी काही आर्थिक स्थिती आहे ही सर्वस्वी त्याने केलेल्या विचारातून झालेल्या कृतीचे फळ आहे.

त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आर्थिक यशापेक्षा चांगले यश हवे असेल, तर तुम्ही जे काही आजपर्यंत करत आहात त्यापेक्षा वेगळी कृती केली पाहिजे. जर वेगळी किंवा लाभदायक कृती करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या फायद्याचे विचार मनामध्ये आले पाहिजेत. पण हे विचार तुमच्या प्रोग्रामिंग मधेच नसतील तर कुठून येणार. बरोबर आहे कि नाही.

अगदी सोप्या भाषेत समझुन घेऊ. समजा तुम्ही तुमच्या आवडत्या एक गाण्याची सिडी बनवून घेतली. पण सिडी बनवताना काहीतरी झाले आणि काही तुमच्या एकदम नावडतीची गाणी त्यामध्ये भरली गेली. प्रत्येक वेळी तुम्ही आवडीची गाणी ऐकण्यासाठी  ती सिडी लावाल, त्या त्या वेळी ती नावडीती गाणी तुम्हाला ऐकावीच लागतील व मन एकदम नाराज होईल. जर ह्या प्रत्येकवेळी ती सिडी बंद करून परत सुरु केली तरी तुम्हाला तेच गाणे परत ऐकावे लागेल. जर ते नावडते गाणे नको असेल तर त्या सीडीच्या आतमध्ये जाऊन ते गाणे Delete अथवा खोडून टाकावे लागेल.

आपल्या आयुष्य ही असेच आहे. जर पैश्याबाद्द्लची नकारत्मक भावना तुमच्या मनावर कोरली गेली असेल तर ती तुमच्या आयुष्यातील आर्थिक प्रगतीला बाधक आहे. त्यामुळे हे सर्व नकारत्मक विचार मनामध्ये जाऊन खोडून टाकले पाहिजेत. वरील सीडीच्या उदाहरणा मध्ये तुम्हाला हे माहिती होते कि ते नावडते गाणे कोणी व कोठे भरले होते. त्यामुळे ते नावडते गाणे त्या सिडी मधून काढून टाकणे एकदम सोपं झाले होते. तसेच तुमच्या मनामधील पैश्याबाद्द्लचा उगम कोठे झाला हे पाहणे आवश्यक ठरेल. त्या विचारांची सवय कशी लागली हे पाहणे बंधनकारक ठरेल. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती खालील तीन प्रकारांमुळे त्याची विचारसरणी घडवत वा बिघडवत असतो.

१.     ऐकणे – तुम्ही लहानपणापासून पैश्याबद्दल काय ऐकत आला आहात?
२.     बघणे – पैश्याच्या अवती भवती तुम्ही काय काय बघितले आहे?
३.     घटना – पैसा केंद्रित तुमच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या आहेत.

वरील तिन्ही गोष्टी तुमच्या सध्याच्या विचारसरणीला कारणीभूत आहेत. तेव्हा सिडी प्रमाणे या तिन्ही गोष्टी काय आहेत हे बघून त्यातील नावडती गाणी खोडून टाकणेच बरोबर ठरेल. एकदाच ही  पैश्यांच्या प्रती (नावडती गाणी) नकारत्मक विचार खोडून टाकेल कि मग आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल.


तेव्हा मित्रा हो, वरील तिन्ही गोष्टीकडे कसे पहायचे व त्यामधून कोणते विचार खोडून टाकायचे ते आपण पुढील लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नवरात्री साजरी करूया, दसऱ्या दिवशी अपराजिता देवीची मनामध्ये स्थापना करूया. तिला प्रार्थना करूया कि मला आर्थिक बाबींचा विजयी कर..

यश - पैश्याचे समीकरण


आपण आपल्या आयुष्यात जे काही पाहतो, ऐकतो हे सर्व आपल्या मनाच्या कपाटामध्ये व्यवस्थित साठवून ठेवलेले असते, ही गोष्ट आपण मागील आठवड्यात लेखामध्ये पाहिली. या सर्व साठवलेल्या गोष्टीमुळे प्रत्येकाची एक प्रकारची मानसिकता तयार झालेली असते व त्याच प्रमाणे आपण निर्णय घेतो.

जसं घर बांधण्यासाठी एक आराखड्याची (Building Blueprint) गरज असते; तसेच योग्य तेवढे पैसे कमावण्यासाठी पैश्याबद्दलची मानसिकता योग्य असावी लागते. यालाच मी आर्थिक यशाचा आराखडा म्हणजे Money Blueprint म्हणतो.

चला तर मग, मागील लेखात सांगितल्या प्रमाणे, यावेळी ही Money Blueprint कशी तयार होते. याच्याकडे थोडे बारकाईने पाहूया. त्यापूर्वी मला तुम्हाला यश आणि पैसा याबद्दल एक समीकरण सांगायचे आहे. मला माहिती आहे कि हे समीकरण तुम्हाला नक्की आवडेल.

विचार भावना कृती (Action) = रिझल्ट (Result)




हा एकमेव Formula तुम्हाला अपेक्षित यश व पैसा देऊ शकतो. म्हणजे काय की,
विचार केल्यामुळे – मनातील भावना जागृत होतात.
भावना जागृत झाल्यामुळे Action घेतली जाते, आणि
जर कृती केली (Action घेतली) तरच Result (निकाल) मिळतो.

जर आपण व्यवस्थित पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि; जी व्यक्ती कामच करत नही ती व्यक्ती विचारच करत नाही. म्हणून जर कोणी चुकीचे वागले तर आपण त्याला म्हणतोच ना, “ जरा विचार कर की लेका”

तुमचे आर्थिक यश हे तुम्ही पैश्याबद्दल कसा विचार करता, पैश्याबद्दलच्या तुमच्या भावना व ते आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्ही काय व कशी कृती करता यावर अवलंबून आहे.

थोडे सोपे कारून पाहूया, माझा एखादा लेख जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा साहजिकच खूप लोक वाचत असतील. यामधील काही फोन करतात काही सोडून देतात. तर काही लोक यापेक्षाही पुढे जाऊन मध्ये व्याख्यान ठेवायची तसदी घेतात.

माझे एक वाचक मित्र श्री. माधव चव्हाण, गाव सुस्ते, ता.पंढरपूर यांनी तसदी घेऊन माझे व्याखान आयोजित केले. हे सर्व करण्यामागे त्यांचा एकच विचार होता/ आहे कि प्रत्येक शेतकरी मित्राला आर्थिक गणित समजले पाहिजे. जर आर्थिक गणित समजले तरच शेतकरी सुखाने जगू शकतो हे त्यांना पूर्णपणे माहित आहे.

आता या घटनेकडे आपण बारकाईने पाहीले तर वरील दिलेले समीकरण किती बरोबर आहे हे आपण पाहू शकतो. अनेक लोकांनी लेख वाचला व सोडून दिला. पण श्री. चव्हाण यांनी लेख वाचताना विचार केला. त्यांच्या शेतकरी बांधवांप्रती चांगल्या भावना जागृत झाल्या याच चांगल्या भावनेने त्यांनी मला निमंत्रण देण्याचे कार्य केले. निव्वळ चांगल्या भावनेने न आठेवेठे घेता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी कार्य केले व मी सुस्ते गावात व्याखानासाठी हजर झालो.

तस पाहीले तर ही खूप छोटीशी घटना आहे. पण याचा व या सारख्या अनेक घटना आहेत ज्याचा तुमचा आर्थिक यशाशी भेट संबंध आहे. मनात तुम्ही हे कसं काय बुवा ! याबद्दल नक्कीच विचार करत असाल. याचं उत्तर असे आहे कि, जर श्री. माधव चव्हाण यांच्या मनात चांगले विचार नसते, तर इतर अनेक लोकांसारखे त्यांनी नुसतं वाचून सोडून दिले असते. पण श्री. चव्हण यांच्या मनावर आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही तरी चांगले करायची मानसिकता ही तयार होती म्हणून त्यांनी विचार करून कृती केली. याला Money Blueprint (आर्थिक आराखडा) च्या भाषेत Programming म्हणतात. या मुळे आता नवीन समीकरण कसे होईल ते पाहूया.

Programming विचार भावना कृती = रिझल्ट (Result)

programming हे आपण अनुभवलेल्या गोष्टी मुळे होत असते. त्यामुळे “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार” ही म्हण तंतोतंत बरोबर ठरते.

मुळातच माझ्या बहुतांश शेतकरी मित्रांची पैश्याबद्दलची विचार धारा ही त्यांच्या आर्थिक यशाला मारक असते. उदा. जवळ जवळ ८०% पेक्षा जास्त शेतकरी मित्र हा कर्जाच्या कचाट्यात सापडलेला असतो. आता कोणी म्हणेल कि निसर्गच साथ देत नाही तर जगण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्राला कर्जामधून बाहेर पडायचे असते, याचा कधी विचारच येत नाही. त्याच्या मनामध्ये जगण्याची हीच पद्धत आहे हे ठासून भरलेले असते.

जर कर्ज विरहीत जीवन हे तुम्हाला माहितीच नसेल तर त्याबद्दल तुम्ही कधीच विचार करणार नाही. जर हा विचारच केला नाही तर त्या दिशेने तुम्ही कधीच प्रयत्न करणार नाही आणि फक्त त्याचं मुळे तुम्ही कधीच कर्जमुक्त होणार नाही हा मात्र १००% निकाल (Result) होय. जर आपण कर्जमुक्त झालो नाही तर आपला आर्थिक बाजू कधीच सुधारणे शक्य नाही.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावर बिंबवलेल्या पैश्याबद्दलच्या विचारांवर काम करणे खूप महत्वाचे आहे. म्हणजेच काय तर डोक्यातील पैश्याबद्दलचे Program / विचार तपासून त्यामध्ये योग्य ते बदल घडवले पाहिजेत.

आता हे आपले मनातील पैश्याबाद्द्लचे विचार काय आहेत आणि बदलायचे कसे, हा विचार तुमच्या मनात येत असेल. पण त्यापूर्वी हे जे काही विचार आपल्या मनावर कोरले गेले आहेत याची सुरवात कुठून झाली यावर थोडा अभ्यास करणे महत्वाचे ठरेल.


तर याच बद्दल आपण पुढच्या लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नमस्कर.

आर्थिक यशाचा आराखडा लेख - १



मंडळी, सर्वप्रथम सर्वांचे आभार, सकारात्मक विचार हवा या सदराला पूर्ण महाराष्ट्रामधून फोन आले. आपल्याला हे सर्व विचार आवडले व ते किती महत्वाचे आहेत हे प्रत्येक व्यक्तीशी बोलताना माझ्या लक्षात येत होते. माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाला आर्थिक प्रगती करण्याची प्रबळ इच्छा आहे हे यावरून स्पष्ट होते.

आता तुम्ही मला सांगा, “कि नुसती इच्छा असून काय होणार आहे का..” त्या साठी तुम्हाला कार्य करणे गरजेचे आहे. पण नेमके तिथेच आपलं घोडं अडतंय आणि मग आपण असलेल्या गोष्टी वर समाधानी व्हायला लागतो. नुसतं एवढाच नाही तर आपण अनेक गोष्टीबद्दल तक्रार करायला सुरवात करतो. जसे कि, निसर्ग साथ देत नाही, शासन आमची काळजी घेत नाही. या गोष्टी योग्य कि अयोग्य या चर्चेमध्ये मला पडायचे नाही. पण मला एक सांगा कि, “जर एखादी गोष्ट मला हवी असेल तर त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागतील ना. आता तुमच्या मनात एक गोष्ट नक्कीच येत असेल कि मी प्रयत्नामध्ये कोठेही कमी पडत नाही, पण नशीबच साथ देत नाही याला मी काय करू…
आता इथेच आपल्या आर्थिक यशाचा नकाशा किंवा आपली आर्थिक संकल्पना आपल्याला उपयुक्त ठरते. समजायला सोपे होण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा तुम्हाला तुमच्या रानात एक स्वतःचे घर बांधायचे आहे. हे घर बांधताना तुम्ही त्याचा एक आराखडा म्हणजे Plan बनवावा लागेल. आराखडा असेल तर प्रत्येक व्यक्तिच्या कामाला दिशा मिळेल व प्रत्येकाचे काम व्यवस्थित होऊन वेळ व पैसा दोन्हीही वाचेल.

आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी पूर्वी पासून छापल्या सारख्या मनावर कोरलेल्या असतात. त्या सर्व गोष्टी (आपल्याला माहिती असलेल्या) नेहमी आपल्याला एकदम बरोबरच वाटतात. या आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आपल्या भोवती एक सुरक्षित कवच (आपल्याला असे वाटते) बनवत असतात. आपण जर हे कवचाच्या बाहेर आलो नाही तर निश्चित आपली आर्थिक प्रगती होणारच नाही.

मित्रांनो एक लक्षात ठेवले पाहिजे कि, “आजपर्यंत जे आर्थिक यश मला मिळाले आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी केले पाहिजे.” आपण सर्व शेतकरी वर्ग. आपली आर्थिक स्थिती सुधारणे अपेक्षित असेल तर आपल्याला आपल्या रानामधून चांगले दर्जेदार पिक मिळाले पाहिजे, या पिकला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. पण याबरोबर एखाद्या पिकावर आपण किती खर्च करतो आहे हे पण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती पाहिजे.

आता मोठा प्रश्न पडला असेल ना, कि एवढ सगळ करायच कधी. एकदम सोपं आहे. एक प्रत्येक माणूस हा सवयीचा गुलाम असतो. सवय दोन प्रकारची असते. एक म्हणजे करायची सवय व दुसरी न करायची. आपण नेहमी न करायची सवयी मध्ये अडकलेलो असतो. आपल्याला एखादी गोष्ट उगाचच कठीण वाटत असते. याच एकमेव कारण म्हणजे आपल्याला जे माहिती आहे, तेच नेहमी बरोबर आहे असे आपण समझत असतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला जे बरोबर वाटते ते माझ्या साठी फायदेशीर असेलच असं नाही. उदा. अनेक माध्यमातून आपल्याला हे संगीतले आहे कि उसाचे पाचट शेतातच सरीमध्ये कुजवले तर खूप नैसर्गिक खत तयार होईल. पण आपल्या बहुतांश शेतकरी बंधूच्या मनात ही कल्पना रुचत नसावी. याच कारण आपण नेहमी हाच विचार करत आलो आहोत कि, “इतकी वर्ष आपल्या वडीलधारी मंडळींनी सांगितलेली गोष्ट खोटं कस असू शकेल”. पण जरसा विचार करूया, पाचट म्हणजे नैसर्गिक कार्ब, जर पाचट शेतातच कुजवले तर रासायनिक खत द्यायचं प्रमाण कमी लागेल. खरं तर पाचट सरी मध्ये राहिले तर पाणी पण कमी लागेल. पण पाचट सरी मध्ये राहिल्यामुळे रानाला पाणी पाजण्याचा त्रास होईल म्हणून आपण एक पळवाट काढली. पाचट जाळून टाकणे. पण याने खरोखरच माझा फायदा होतो का, याचा विचार आपण खुप कमी वेळा केला असेल. इतकी वर्ष जे सांगितले आहे तेच बरोबर समझुन करत गेलो. अश्या अनेक गोष्टी आपण शेतात करत असतो कि ज्या आपण का करतो हेच आपल्याला माहिती नसतं.

आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल कि याचा आणि आर्थिक व पैसा याचा काय संबध आहे. पण जरा विचार करा कि, “आपल्या रानामधून चांगले दर्जेदार पिक आले व त्याला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी चांगले पैसे मिळवू शकेल.” आपण अश्या सर्व सवयी ज्या आपल्याला बाधक आहेत त्या शोधून काढल्या आणि त्या चांगल्यासाठी बदलल्या तर मित्रहो फायदा आपलाच होणार आहे ना.
चांगला फायदा झाला तरच आपण चांगली गुंतवणूक करून आपले आयुष्य स्थिर करू शकतो. थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करूया. जर आंब्याच्या झाडाला चांगले आंबे येत नसतील तर आपल्याला त्या झाडाच्या मुळांची काळजी घ्यायला पाहिजे कि नाही. तसेच आपल्या आयुष्याच्या झाडाला चांगले आर्थिक यश हवे असेल तर आपल्या विचारांवर (पैश्याबद्दलच्या) काम केले पाहिजे. यालाच मी “आर्थिक यशाचा आराखडा (Money Blueprint) असे म्हणतो.

पुढील भाग मध्ये हा आर्थिक आराखडा आपल्या मनामध्ये कसा तयार होतो व त्याचे फायदे तोटे काय हे समजून घ्यायचे प्रयत्न करू.


Thursday, 17 December 2015

Wednesday, 9 September 2015

Wealth mantras#5 Rich people focus on opportunities. Poor people focus on obstacles.








Rich people see opportunities. Poor people see obstacles. Rich people see potential growth. Poor people see potential loss. Rich people focus on the rewards. Poor focus on risks.

Middle-class people are slightly more optimistic. Their mind set is “I sure hope this works.”
Rich people, as we’ve said earlier, take responsibility for the result in their lives and upon the mind-set “It will work because I’II make it work.”

Generally speaking, the higher the reward, the higher the risk. They are willing to take risk. They believe that, if worse comes to worst, they can always make their money back.

Poor people, on the other hand, expect to fail. They lack confidence in themselves and in their abilities. And because they constantly see obstacles, they are usually unwilling to take risk. No risk, no reward.

Another key principle, pertinent here, is that rich people focus on what they want, while poor people focus on what they don’t want. Again, the universal law states, “What you focus on expands.”
It’s simple. Your field of focus determines what you find in life. Focus on opportunities and that’s what you find.  Focus on obstacles and that’s what you find. I’m not saying that you don’t take care of problems. Of course, handle problems as they arise, in the present. But keep your eye on your goal, keep moving towards your target. Put your time and energy into creating what you want.  

Do you want some simple but extremely rare advice? Here it is: if you want to get rich, focus on making, keeping, and investing your money. If you want to be poor, focus on spending your money. You can read a thousand books and take a hundred courses on success, but it all boils down to that. Remember, what you focus on expands.

Good luck and stay connected for my next blog on wealth file.

Wealth mantras # Rich people admire other rich and successful people. Poor people resent rich and successful people.