Showing posts with label womensday. blueprint. Show all posts
Showing posts with label womensday. blueprint. Show all posts

Thursday, 5 January 2017

आर्थिक नियोजन




ता. २ जानेवारी २०१७. सर्व प्रथम माझ्या सर्व वाचक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घना व राधा या नवविवाहित जोड्याची गोष्ट सांगणार आहे. जानेवारी ते मार्च हा साधारणपणे प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाचे महिने. याचे महिन्यात तुमचे कामाचे मुल्यांकन करून तुमची पगार वाढ ठरणार असते. आज घनाची त्याच्या बॉस बरोबर चर्चा असते. बराच वेळ चर्चा झाल्यावर घना बॉस च्या केबिन मधून नाचतच बाहेर आला. ताबडतोब राधाला एक SMS पाठवला. आपण ठरल्याप्रमाणे ४१” LED च्या हप्त्याची सोय झाली बर का? १ एप्रिल पासून माझा पगार रु. ५,०००/- ने वाढला. राधा ने पण लगेच उत्तर पाठवले, अभिनंद मग आज कोणत्या हॉटेल मध्ये पार्टी देणार.

असा चित्र जवळ जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

१ एप्रिल, घना व राधा एकदम खुश. ४१” LED घरी आणतो. दोघेही आनंदात चहा घेत LED पाहत या नवीन वस्तूचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात त्याची ५ वर्षा ची मुलगी त्यांच्या जवळ येते. आता संपूर्ण परिवार LED समोर असताना, काही केल्याने घनाला आनंद मिळत नसतो. एक प्रकाची अनामिक भीती त्याच्या मनात असते. पण काय ह्याचा उलगडा मात्र होत नाही. आपल्या नियोजन मध्ये काही तरी चुकतंय याची खात्री होते. पण काय चुकतंय हेच कळत नाही. शेवटी घना LED सोडून आपल्या रूम मध्ये जातो व शांतपणे विचार करू लागतो. पण विचारांना दिशा मिळत नाही व मन अधिकच अवस्थ होते. काहीच सुचत नाही.. कोणतीच दिशा मिळत नाही.. म्हणून घना उठतो व उद्या ऑफिस काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो. त्याला आठवते कि, आपल्याला परवा ऑफिसच्या कामासाठी मुंबई ला जायचे आहे व आपल्याला डेक्कन क़्विन चे आरक्षण करणे आवश्यक आहे. घना पटकन उठून बाहेर जायच्या तयारीला लागतो आणि अचानक त्याचे डोळे चमकतात. आरेच्या... मी मघापासून ज्यासाठी अस्वथ होतो ते तर खूपच सोप्प आहे. जसं मी माझ्या ऑफिस च्या कामाचे नियोजन करतो तसेच मला माझ्या भविष्यात येणाऱ्या गरजांसाठी “आर्थिक” नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काय आहेत व त्यासाठी काय करायचे याचा विचार करू लागतो.

घनाचे मन थोडा हलक होते. आता विचारांना थोडी दिशा मिळते. त्याला आता काय करायचे आहे याबद्दल सुचू लागते.

आज जी काही घनाची मानसिक अवस्था आहे. ह्या अवस्थे बद्दल या पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला माहित आहे. पण त्या अवस्थेवर विचार न केल्यामुळे बऱ्याच लोकांना यावर उपाय सुचत नाही.  यावर उपाय म्हणजे, ‘वयक्तिक वित्त नियोजन” म्हणजेच “Personal Financial Planning”

घनाला या विषयाबद्दल जेव्हा समज येते तेव्हा घना जरा घाबरूनच जातो. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वित्त नियोजन म्हणजे नेमके काय ? पण पैश्याचे नियोजन करायचे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे हवे, माझ्या तुटपुंज्या पगार मध्ये कसलं नियोजन न काय? नियोजन करून घेण्यासाठी कोणाकडे जायचे ? नियोजन करणारा खूप पैसे घेईल का ? इत्यादी...

असे अनेक प्रश्नांचे ओझे घनाला मनावर यायला लागते. अशाच अवस्थेत तो बाहेर पडतो. मी, तुम्ही, आणि आपल्या सर्वांनसाठी “Personal Financial Planning” म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ततपूर्वी आपण श्री. बुफेत  यांची काही कमाई, खर्च, बचत यावर काही मार्ग दर्शन तत्त्वे आहेत, त्या बद्दल आपण जाणून घेऊ. श्री. बुफेत म्हणतात:-

१.      आपण कधीही एकाच कमाई वर अवलंबून राहू नये. आपण अशा प्रकारे गुंतवणूक करावी कि त्यातून आपल्याला नवीन उत्पन्न सुरु होईल.

२.      खर्चाच्या बाबतीत श्री. बुफेत म्हणतात कि, जर आपण आपल्याला गरज नसेलेली वस्तू विकत घेतली तर, लवकरच आपल्याला गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील.

३.      बचतीचे समीकरण खालील प्रमाणे: कमाई – बचत = खर्च

पण कमाई- खर्च = बचत असे असू नये.



श्री. बुफेत यांची तत्त्वे एकल्या नंतर घनाला ऐकेक प्रश्नाचा उलगडा होऊ लागला. घनाला आपण करत असलेल्या चुका लक्षात येऊ लागतात. कळून चुकते कि, LED चा आतातायी निर्णय घेतल्यामुळे विनाकारण वयक्तिक बोझा वाढून ठेवला आहे. पण तरी सुद्धा “Personal Financial Planning” म्हणजे काय याचा उलगडा होत नाही. बचत करावी लागेल, बचत करून गुंतवणूक केली पाहिजे, या गुंतवणीकीतून नवीन उत्पन्न झाले पाहिजे. पण नेमके किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल काही कल्पना आली नाही.

घनाच्या या प्रश्नांबद्दल आपण थोडे विचार करू वरील सर्व प्रश्न पाहता आपल्याला हे लक्षात येईल कि, “घनाला नक्की काय हवं आहे हेच कळत नाही,” त्याची आयुष्यातील नेमकी काय उधिष्ट आहेत हेच त्याला माहित नाही. चला तर आपण या गोष्टी समझुन घेण्यासाठी चार महत्वाचे प्रश्न बद्दल चर्चा करू. या चार प्रश्नाची उत्तरे देताना/ लिहताना आपण आपल्याला घनाला काय हवे आहे याचा नेमका उलगडा होईल,हे सर्व प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचे आहेत.

प्रश्न १. आज पासून माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत (म्हणजे वय वर्ष ७५/८० पर्यंत) अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत व त्यामुळे मी आनंदी राहीन.



प्रश्न २. या सर्व गोष्टी मला त्या त्या वेळेत सध्या करायच्या असतील तर अशा कोणत्या अडचणी आहेत ज्यांना मला सामोरे जायचे आहे.



प्रश्न ३. अश्या कोणत्या उत्कृष्ट संधी मला साधायच्या आहेत ज्यावर मला १००% लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याजवळ पकडून ठेवायच्या आहेत.



प्रश्न ४. माझ्या मध्ये असे कोणते गुण आहेत ज्यावर मला आणखी काम करायचे आहे व या सर्व उद्धिष्ट पर्यंत पोहचण्यासाठी अशी कोणती Skill & Resourse वर काम करायचे आहे जे माझ्या कडे आज नाहीत.

या चार प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या मनाप्रमाणे, प्रामाणिकपणे जर लिहिली तर आपली मानसिक अवस्था एकदम उच्च दर्ज्याची होईल. आपल्याला नेमके हे कळून जाईल कि,मला कोठे जायचे आहे. जेथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी मला काय करायचे आहे आणि त्यासाठी किती वेळ आहे.  आजचा लेख जरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित असला तरीही बहुतांश व्यावसायिक व शेतकरी मित्र याच मानसिकते मधून जातात. किंबहुना प्रत्येक व्यावसायिक व शेतकरी मित्राला यांच्या पैशाच्या नियोजना बाबतीत घना पेक्षा जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे. तेव्हा मित्रांनो माझ्या पुढील लेखापर्यंत सर्वांची वरील चार प्रश्नांची स्वतः साठीची उत्तरे तयार करून ठेवा. आपण या विषयी सविस्तर बोलणारा आहोत. आज जर तुम्ही तयारी केलीत तर पुढील वाटचालीत त्याचा पूर्ण उपयोग करून घेता येईल.

Friday, 23 December 2016

कर्ज मुक्तीचा – संकल्प



वर्ष २०१६ मधील शेवटचा महिना सुरु आहे. शेवटचे २६ दिवस शिल्लक आहेत. बहुतेक शेतकरी मित्र उस जाण्याची वाट पहात आहे. मराठी माणसाच नविन वर्ष जर पाडव्याच्या दिवसी सुरु होत असल तरी गोऱ्या लोकांच्या सवई प्रमाणे बहुतेक सर्वच जण १ जानेवारी हा दिवस नविन वर्ष म्हणून साजरा करतात. प्रत्येक नविन वर्षी साधारण वर्षाच्या पहिल्या दिवशी, जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती काहीना काही संकल्प करत असतो.

      संकल्प म्हणजे – स्वतःच्या वाईट सवयी घालवणे अथवा प्रगती करणे यासाठी स्वतः घेतलेली शपथ. जरी स्वतःच्या  प्रगती साठी शपथ घेतली असली तरी असे निदर्शनात आले आहे कि ९०% लोकांचे संकल्प पहिल्या १० दिवसातच मोडतात. असे का होते यावर अभ्यास करून त्यावर काही तोडगा काढण्याच्या ऐवजी बहुतांश जण, "नियम / संकल्प हे मोडण्यासाठीच असतात, अशी मनाची समजुत घालून विषय सोडून देतात.”

      आता नविन वर्षाचा संकल्प करणे हे शहरी लोकांच काम आहे. अशी पद्धत आपण गाव पातळीवरही करू शकतो. याबाबत आपण शेतकरी मंडळी विचार करत नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस शहरातील असो कि  गावातला, काहीना काही संकल्प करतच असतो. पण तो संकल्प अगदी आयत्या वेळेस केल्याने तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता तयार झालेली नसते.

      चला तर मग. आज हे जाणण्याचा प्रयत्न करूया कि असे का होते. अगदी साध्या शब्दात सांगायचे म्हणजे त्या संकल्पाच्या मागील उद्देश फारच डळमळीत असतो. साधारण पणे आपण खालील प्रकारांमध्ये आपले संकल्प मांडत असतो.

१.      पैश्याच्या बाबतीत.
२.      तुमचे करियर.
३.      तुमची तब्येत.
४.      तुम्हाला काही समाज सेवा करायची आहे.
५.      अध्यात्म.
६.      करमणूक इ.
तुम्ही कोणतेही संकल्प घ्या. साधारणपणे याच साच्या मध्ये मोडतात. हे सर्व संकल्प पूर्ण झाल्यास अंतिम फायदा हा तुम्हालाच होणार असतो. तरी पण तो संकल्प पूर्ण होत नाही. याचे काही खालील नमूद कारणे आहेत.

१.      नेमका उद्दिष्ट माहिती नसते.
या मध्ये तुमचा संकल्प तुम्हाला नेमके काय देणार हे माहिती नसते. उदा:- यंदाच्या वर्षी मला माझी तब्येत चांगली करायची आहे. म्हणजे नेमके काय, हेच माहिती नसल्यामुळे तुम्ही जे अनावश्यक आहे तेच करत राहता. म्हणजे तब्येत चांगली करणे म्हणजे भरपूर खाणे हे समजून अगदी उलट काम केले जाते.

२.      उद्दिष्ट अवास्तव असतात
उदाहरण घ्यायचे झाले तर, यंदाच्या वर्षी मी उच्चांकी उसाचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. असे जर विचार / संकल्प असतील तर नक्कीच प्रॉब्लेम आहे. जर बारकाईने विचार केला तर मागील ४ वर्षात तुमचे सरासरी एकरी उत्पादन ३० तर ४० टनाचे असेल तर अचानक उच्चांकी म्हणजे १०० टनाच्या वर कसे होईल.
      काही काळ निघून जातो व हा संकल्प आवाक्याच्या बाहेर आहे समझुन सोडून दिले जातो. परत ये रे माझ्या मागल्या.

३.      सर्व संकल्प तुमची इच्छां यावर अवलंबून असतात. त्यामागे कोणतीही system किंवा एखादी कार्य पद्धती नसते.
वरील तीन कारणे आहेत ज्यामुळे संकल्प सिद्धीस जात नाही. पण याबरोबर अशी बरीच मंडळी आहेत ज्यांचे संकल्प पूर्ण होतात. तेव्हा तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे ते पाहूया.
माझे शेतकरी बांधव हे नेहमीच कर्ज – सोसायटी, पिक कर्ज, तारण कर्ज, सावकारी कर्ज अश्या एक व अनेक कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. तर मला असे वाटते कि, “ आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया.” पुढील वर्षी कर्जाच्या कचाट्यातून बाहेत पडायचे. सुरवातीला अवघड वाटेल, पण जसं जसं प्रयत्न सुरु होतील तसं खूपच सोप्पं होईल. तेव्हा मंडळी; कागद आणि पेन घ्या व खालील प्रमाणे गोष्टी मीहून काढा.
१.      कर्ज फेडी बाबतीत तुमचे नेमके काय उद्धिष्ट आहे. तुमचे आत्ताचे कर्ज कितीही असो. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सुरवात करावीच लागेल ना. तर उद्धिष्ट ठेऊन काम करूया. या कर्जा पैकी यंदाच्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत किती रुपयांचे कर्ज कमी करणार हे लिहून काढा.
२.      कर्ज फेडीचे उद्धिष्ट सोप्प ठेवा:- म्हणजे तुमचे एकूण कर्जापैकी ज्या कर्जासाठी तुम्ही जास्त व्याजदर देता ती कर्ज पहिला निवडा. मित्रांनो जर डोंगराच्या शिखरावर जायचे असेल तर डोंगर चढण्यासाठी पहीले पाऊल तर टाकलेच पाहिजे. तर आज कर्जमुक्तीच्या दिशेने पहीले पाऊल टाका.
३.      जो काही तुम्ही कर्जफेडीचा विडा/ संकल्प उचलला आहे त्यासाठी नुसती इच्छा न ठेवता त्यासाठी लागणारी कार्य पद्धतीने स्वीकारा.

म्हणजे काय तर तुम्हाला कोठून पैसा येणार आहे आणि त्याचे नियोजन कसे करणार यावर भर दया.
आता तुम्ही विचार करत असाल कि नविन वर्ष सुरु होण्यासठी अजून २६ दिवस आहेत. आज कशाचा संकल्प. पण मित्रांनो ज्या दिवशी आपण ठरवू तोच आपला नविन वर्षाचा पहिला दिवस. आज सर्व साखर कारखाने सुरु झालेत. थंडीचे दिवस आहेत. मार्केट मध्ये विविध रंगाची फळे आली आहेत. म्हणजे काय आपण पेरलेला व काळजी घेऊन वाढवलेला शेतमाल बाजारात आहे. म्हणजे शेतकरी मित्राकडे पैसा येत आहे. त्यामुळे मला वाटले कि आजच “कर्जफेडीची व त्यातून मुक्त होण्यासाठीचा” पाहीले पाऊल टाकण्याचा दिवस आहे.

जरा विचार करा, कर्जफेडीचा विचारच केला नाही तर तर कर्ज कधीच कमी होणार नाही. आज विचार केला नाही तर परत आहेच, ये रे माझ्या मागल्या. कर्जातून बाहेर पडावे ही तर मनापासून इच्छा असते प्रत्येकाची. पण त्या दृष्टीने प्रयत्न केला जात नाही. याचं एकमेव कारण म्हणजे, “कर्ज हे शेतकरी बंधूच्या जीवनाचा भाग झाला आहे. कर्जा शिवायही जीवन असत कदाचित तुम्ही विसरला आहात.” जर कर्ज मुक्त झालो तर व्याजापोटी जाणारी रक्कम हा तुमचा थेट नफा आहे. एवढे ध्यानात असु द्या.
      तेव्हा आजच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कर्ज मुक्तीचा संकल्प करूया. त्यासाठी कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर कर्ज नियोजन व परतफेड योग्य प्रकारे केली तर तुमचे किती पैसे वाचू शकतात हे पुढील लेखामध्ये उदाहरणा सहित बघूया.



नोट बंदी व आर्थिक व्यवस्थापण



नमस्कार मंडळी.... मागील काही लेखांमधून तुम्हाला आलेल्या अनुभवावरून तुमचे पैश्याचे विचार कसे बनतात हे पहात आलो आहे. काय योगा योग आहे पहा.... याच दरम्यान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक कायम आठवणीत राहणारा अनुभव मिळाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.०० वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी  ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. म्हणजे ९ नोव्हेंबर पासून या सर्व नोटा व्यवहारात चालणार नाही असे सांगितले, आणि बऱ्याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मागील १० दिवसांमध्ये खूप चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. गोष्ट आहे ग्रामीण भागातील. एक वयस्कर मावशी, वय साधारण ६०-६५ असेल. परिस्थिती खुपच बेताची. मावशी तशी व्यवहारी. पैसा जापुन ठेवला होता, पण घरी. थोडे थोडे साठवून मावशी कडे तब्बल रु.१,७३,०००/- होते. ते पण ५०० व १००० नोटा मधून. अचानक नोट बंदी मुळे मावशी घाबरली. पण जेव्हा सर्व गोष्टींची कल्पना आली त्यावेळी थोडी स्थिरावली. आपल्या जवळ असलेला / जमा केलेला कष्टाचा पैसा बॅंकेत जमा करून हवं तसा काढता येतो हे समजल्यावर तिने तिचा तो घरी ठेवलेला पैसा काही महिन्यापूर्वी उघडलेल्या जन-धन खात्यात भरून ठाकला व निश्चिंत झाली.

गोष्ट एकदम साधी पण भरपूर काही शिकवून जाते. प्रथम दर्शनी या नोट बंदी निर्णयाचा खुपच त्रास वाटतोय, कारण तुम्ही तुमच्या पूर्वीच्या सवयीचे सध्या गुलाम आहात. बदल हा कोणालाच सहजासहजी नको असतो. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही तुमच्या Comfort Zone मधून बाहेर पडायला तयार नसता. इथे मावशीला ह्या तिच्याकडच्या नोटा तिच्या हातातून बॅंकेच्या म्हणजे दुसऱ्या हातात देणे जड जात होते. इतके महिने बँकेत खाते असून पैसे बॅंकेत भरले नाही कारण, “त्या सर्व नोटा स्वतःच्या जवळ ठेवण्यात इतक्या वर्ष पासून तयार झालेली मानसिकता व त्यातून मिळणारे समाधान हे होय.” या उदाहरणा प्रमाणे, खूप सारे शेतकरी मित्र शेतमाल विक्रीचा पैसा घरीच ठेवण्यात समाधान मानतात. पण या मधून प्रत्येकाचे खूप मोठे नुकसान होत असते.

निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. बघा ना.... निसर्ग तुम्हाला असंख्य प्रकारची फळे देतो. नुसतं देत नाही.... तर तुम्हाला ती फळे खाण्यापासून रोखत नाही. पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि या प्रत्येक फळा सोबत तुम्हला बी पण मिळते. निसर्ग चक्र सुरक्षित राहण्यासाठी त्या फळा बरोबर मिळालेले बी जर तम्ही निसर्गात पेरले नाही तर तुम्हाला परत फळे खायला मिळण्याची शक्यता कमी आहे. पैश्याचं ही तसंच गणित असते. मिळालेल्या  पैश्यातून काही पैसा चांगले बीज म्हणून बाजूला काढला पाहिजे. पण वरील गोष्टीमध्ये सांगितलेल्या मावशी प्रमाणे नुसता बाजूला काढून उपयोग नाही तर त्याचे व्यवस्थित बिजारोपण केले पाहिजे. तरच नवीन झाड येईल. ही इतकी साधी गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव अनेक वर्ष करत आला आहे. उदा:- तुमच्या कडे खरीपातील  भाताचे खूपच जुने व उत्तम प्रतीचे वाण आहे. दर वर्षी भात कापणी झाल्यावर सगळ्यातच भाताचे तांदूळ न करता त्यातील काही भाग हा पुढील वर्षीसाठी बीज म्हणून ठेवला जातो. आता हे बीज जर पेरले नाही तर नवीन उगवणार कसे. जर असे प्रत्येक शेतकऱ्याने केले तर बाजारात उत्तम प्रतीचे बीज मिळणार नाही व काही वर्षांनंतर त्या प्रतीचे वाण बाजारातून नष्ट होईल. त्या प्रकारच्या तांदळाचा तुटवडा जाणवावा लागेल. नवीन बीज तयार तरी किती करणार. एका बाजूला कोणीतरी दडपून ठेवल्यामुळे ते बीज खराब होत असते व जे नवीन तयार करणार त्याची प्रत चांगली असेलच याची खात्री नाही.
निसर्ग तुम्हला आम्हाला हे सांगतो कि जे लपून ठेवलेले बीज आहे ते चलनात / वापरात आले पाहिजे. तरच नवीन उत्तम प्रतीचे बीज तयार होईल. तसेच काही गणित अर्थशास्त्र सांगते. अर्थशास्त्राचे जीवनात खूपच महत्व आहे. प्रत्येक वेळी माणसाकडे पैसा आला कि त्याला दोन मार्ग असतात. एक म्हणजे – खर्च करून टाकणे व दुसरा म्हणजे बचत करणे. भाताच्या उत्तम प्रतीच्या वाणा प्रमाणे बीज बाजूला काढून जर ते पेरलेच नाही तर नवीन भात तयार कसा होणार. तसेच बचत केलेला पैसा जर मावशी सारखा घरीच ठेवला तर तो नवीन पैसा कसा तयार करेल. हाच पैसा बँकेत ठेवला, व्यवस्थित गुंतवला तर परतावा मिळेल व पैसा वाढेल. जर हा निसर्गाने सांगितलेला मार्ग तुम्ही पाळला, चांगली बचत करून जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनात जादू होईल. तुम्ही भाताच्या चांगल्या बिजाप्रमाणे पैश्याची काळजी घ्या. बघा पैसे तुमचे एवढी काळजी घेतील कि कळत - नकळत तुम्ही वेगाने श्रीमंतीकडे वाटचाल कराल.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भलेही काळा पैसा ( म्हणजेत जे भाताचे चांगले वाण जे लोकांनी दाबून ठेवले आहे ) बाहेर काढण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, तरीही मला वाटते कि या निमित्ताने कळत - नकळत तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसाही जो तुमच्यासाठी काम करत नव्हता, तो आता काम करायला लागेल. घरी ठेवलेला पैसा चलनात येईल. प्रत्येक शेतकरी बांधवाने एवढे केले तर देशाबरोबर / तुमच्या जीवनातही अर्थक्रांती घडेल.

नोट बंदीच्या घटनेमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या Money Blueprint (आर्थिक आराखडा) मध्ये एक गोष्ट नक्की कोरली जाईल कि, “जस निसर्गाने दिलेले बीज जर पेरले नाही तर ते खराब होऊन जाईल, तसेच मिळवलेला पैसा जर गुंतवला नाही, चलनात आणला नाही तर तो ही एक ना एक दिवस खराब होईल.”


चलनात न येणाऱ्या पैश्याचे राष्ट्रीय पातळीवर खूप वेगवेगळे तोटे आहेत. या गोष्टी पर्यंत सामान्य माणसाचे विचार ही पोहचत नाही. पण तुमचा स्वतःचा पैसा जरी चलनात नसेल तर त्याचे ही तोटे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही, तुमच्यासाठी तुमच्या जवळ महनतीने साठवलेला ५०० व १००० च्या नोटा चलनात आणा. म्हणजे बँकेत भरा. असे केल्याने तुमचाच फायदा आहे व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलेल्या उद्धिष्टां पर्यंत पोहोचण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला.

Thursday, 2 April 2015

Financial Fitness





Hi friends, It is since 2004 we at “Kaijing Financial Planners” work in the area of personal financial planning. Over this period we have achieved following credentials.

 Over this period I have been official speaker on "Economic Times Investors Forum 2006, Sakaal Investmeet 2007 till 2011".

 I have been taking sessions on Financial Planning with KPIT Cummins, L&T Infotech (Pune and Mumbai), BMC Software to name a few.

During this journey I have delivered Financial Planning session to over 25000 people.

My observation while I did my financial planning sessions is that; every person needs their own financial planning to be done. But hardly 1% or 2% actually do the financial planning. I was bit worried. After attending session most of them get a short blast of energy and then it’s back to the status quo.

So begin investigate the reason. After going through lot of books, seminars, CD’s, finally we got the answer. And believe me answer is very simple, it’s a law. It all comes down to the basic principle which states that; 

If your subconscious “Financial Blueprint” is not “set” for success, nothing you will learn, nothing you know and nothing you do will make a difference.

Over the period of time we will demystify you “Why some people are destined to be rich and others are destined for a life of struggle. You will understand the root cause of success, mediocrity or financial failure, and begin your financial future for the better.
In short; over the time period you are going to learn “How to master the inner game of money to win the game of money” – How to think rich to get rich!

So let us begin our journey to understand what is “Financial Blueprint” is all about.


Stay tuned for our next Blog.