Showing posts with label wealth management. Show all posts
Showing posts with label wealth management. Show all posts

Thursday, 5 January 2017

आर्थिक नियोजन




ता. २ जानेवारी २०१७. सर्व प्रथम माझ्या सर्व वाचक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घना व राधा या नवविवाहित जोड्याची गोष्ट सांगणार आहे. जानेवारी ते मार्च हा साधारणपणे प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाचे महिने. याचे महिन्यात तुमचे कामाचे मुल्यांकन करून तुमची पगार वाढ ठरणार असते. आज घनाची त्याच्या बॉस बरोबर चर्चा असते. बराच वेळ चर्चा झाल्यावर घना बॉस च्या केबिन मधून नाचतच बाहेर आला. ताबडतोब राधाला एक SMS पाठवला. आपण ठरल्याप्रमाणे ४१” LED च्या हप्त्याची सोय झाली बर का? १ एप्रिल पासून माझा पगार रु. ५,०००/- ने वाढला. राधा ने पण लगेच उत्तर पाठवले, अभिनंद मग आज कोणत्या हॉटेल मध्ये पार्टी देणार.

असा चित्र जवळ जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

१ एप्रिल, घना व राधा एकदम खुश. ४१” LED घरी आणतो. दोघेही आनंदात चहा घेत LED पाहत या नवीन वस्तूचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात त्याची ५ वर्षा ची मुलगी त्यांच्या जवळ येते. आता संपूर्ण परिवार LED समोर असताना, काही केल्याने घनाला आनंद मिळत नसतो. एक प्रकाची अनामिक भीती त्याच्या मनात असते. पण काय ह्याचा उलगडा मात्र होत नाही. आपल्या नियोजन मध्ये काही तरी चुकतंय याची खात्री होते. पण काय चुकतंय हेच कळत नाही. शेवटी घना LED सोडून आपल्या रूम मध्ये जातो व शांतपणे विचार करू लागतो. पण विचारांना दिशा मिळत नाही व मन अधिकच अवस्थ होते. काहीच सुचत नाही.. कोणतीच दिशा मिळत नाही.. म्हणून घना उठतो व उद्या ऑफिस काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो. त्याला आठवते कि, आपल्याला परवा ऑफिसच्या कामासाठी मुंबई ला जायचे आहे व आपल्याला डेक्कन क़्विन चे आरक्षण करणे आवश्यक आहे. घना पटकन उठून बाहेर जायच्या तयारीला लागतो आणि अचानक त्याचे डोळे चमकतात. आरेच्या... मी मघापासून ज्यासाठी अस्वथ होतो ते तर खूपच सोप्प आहे. जसं मी माझ्या ऑफिस च्या कामाचे नियोजन करतो तसेच मला माझ्या भविष्यात येणाऱ्या गरजांसाठी “आर्थिक” नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काय आहेत व त्यासाठी काय करायचे याचा विचार करू लागतो.

घनाचे मन थोडा हलक होते. आता विचारांना थोडी दिशा मिळते. त्याला आता काय करायचे आहे याबद्दल सुचू लागते.

आज जी काही घनाची मानसिक अवस्था आहे. ह्या अवस्थे बद्दल या पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला माहित आहे. पण त्या अवस्थेवर विचार न केल्यामुळे बऱ्याच लोकांना यावर उपाय सुचत नाही.  यावर उपाय म्हणजे, ‘वयक्तिक वित्त नियोजन” म्हणजेच “Personal Financial Planning”

घनाला या विषयाबद्दल जेव्हा समज येते तेव्हा घना जरा घाबरूनच जातो. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वित्त नियोजन म्हणजे नेमके काय ? पण पैश्याचे नियोजन करायचे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे हवे, माझ्या तुटपुंज्या पगार मध्ये कसलं नियोजन न काय? नियोजन करून घेण्यासाठी कोणाकडे जायचे ? नियोजन करणारा खूप पैसे घेईल का ? इत्यादी...

असे अनेक प्रश्नांचे ओझे घनाला मनावर यायला लागते. अशाच अवस्थेत तो बाहेर पडतो. मी, तुम्ही, आणि आपल्या सर्वांनसाठी “Personal Financial Planning” म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ततपूर्वी आपण श्री. बुफेत  यांची काही कमाई, खर्च, बचत यावर काही मार्ग दर्शन तत्त्वे आहेत, त्या बद्दल आपण जाणून घेऊ. श्री. बुफेत म्हणतात:-

१.      आपण कधीही एकाच कमाई वर अवलंबून राहू नये. आपण अशा प्रकारे गुंतवणूक करावी कि त्यातून आपल्याला नवीन उत्पन्न सुरु होईल.

२.      खर्चाच्या बाबतीत श्री. बुफेत म्हणतात कि, जर आपण आपल्याला गरज नसेलेली वस्तू विकत घेतली तर, लवकरच आपल्याला गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील.

३.      बचतीचे समीकरण खालील प्रमाणे: कमाई – बचत = खर्च

पण कमाई- खर्च = बचत असे असू नये.



श्री. बुफेत यांची तत्त्वे एकल्या नंतर घनाला ऐकेक प्रश्नाचा उलगडा होऊ लागला. घनाला आपण करत असलेल्या चुका लक्षात येऊ लागतात. कळून चुकते कि, LED चा आतातायी निर्णय घेतल्यामुळे विनाकारण वयक्तिक बोझा वाढून ठेवला आहे. पण तरी सुद्धा “Personal Financial Planning” म्हणजे काय याचा उलगडा होत नाही. बचत करावी लागेल, बचत करून गुंतवणूक केली पाहिजे, या गुंतवणीकीतून नवीन उत्पन्न झाले पाहिजे. पण नेमके किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल काही कल्पना आली नाही.

घनाच्या या प्रश्नांबद्दल आपण थोडे विचार करू वरील सर्व प्रश्न पाहता आपल्याला हे लक्षात येईल कि, “घनाला नक्की काय हवं आहे हेच कळत नाही,” त्याची आयुष्यातील नेमकी काय उधिष्ट आहेत हेच त्याला माहित नाही. चला तर आपण या गोष्टी समझुन घेण्यासाठी चार महत्वाचे प्रश्न बद्दल चर्चा करू. या चार प्रश्नाची उत्तरे देताना/ लिहताना आपण आपल्याला घनाला काय हवे आहे याचा नेमका उलगडा होईल,हे सर्व प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचे आहेत.

प्रश्न १. आज पासून माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत (म्हणजे वय वर्ष ७५/८० पर्यंत) अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत व त्यामुळे मी आनंदी राहीन.



प्रश्न २. या सर्व गोष्टी मला त्या त्या वेळेत सध्या करायच्या असतील तर अशा कोणत्या अडचणी आहेत ज्यांना मला सामोरे जायचे आहे.



प्रश्न ३. अश्या कोणत्या उत्कृष्ट संधी मला साधायच्या आहेत ज्यावर मला १००% लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याजवळ पकडून ठेवायच्या आहेत.



प्रश्न ४. माझ्या मध्ये असे कोणते गुण आहेत ज्यावर मला आणखी काम करायचे आहे व या सर्व उद्धिष्ट पर्यंत पोहचण्यासाठी अशी कोणती Skill & Resourse वर काम करायचे आहे जे माझ्या कडे आज नाहीत.

या चार प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या मनाप्रमाणे, प्रामाणिकपणे जर लिहिली तर आपली मानसिक अवस्था एकदम उच्च दर्ज्याची होईल. आपल्याला नेमके हे कळून जाईल कि,मला कोठे जायचे आहे. जेथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी मला काय करायचे आहे आणि त्यासाठी किती वेळ आहे.  आजचा लेख जरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित असला तरीही बहुतांश व्यावसायिक व शेतकरी मित्र याच मानसिकते मधून जातात. किंबहुना प्रत्येक व्यावसायिक व शेतकरी मित्राला यांच्या पैशाच्या नियोजना बाबतीत घना पेक्षा जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे. तेव्हा मित्रांनो माझ्या पुढील लेखापर्यंत सर्वांची वरील चार प्रश्नांची स्वतः साठीची उत्तरे तयार करून ठेवा. आपण या विषयी सविस्तर बोलणारा आहोत. आज जर तुम्ही तयारी केलीत तर पुढील वाटचालीत त्याचा पूर्ण उपयोग करून घेता येईल.

Friday, 23 December 2016

आराखडा – पूर्ण कर्ज मुक्तीचा





आज दिनांक १९ डिसेंबर २०१६. म्हणजे हे वर्ष संपण्यास फक्त १२ दिवस शिल्लक आहेत. २०१७ हे वर्ष तुम्हला कर्जमुक्तीसाठी व्हायचे असेल तर आजपासून त्याची तयारी करूया. मागील आठवड्यातील “कर्ज मुक्तीचा – संकल्प” हा लेख वाचल्यावर खूप शेतकरी बांधवांनी मला फोन करून विचारले कि, “कर्ज माफी होणार आहे का म्हणून.” मित्रांनो इथे मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो कि असं काहीही होणार नाही असं मान्य करून चला. कर्ज नियोजन यातील काही घोड समज – गैरसमज आहेत. सर्वांचा असा समज आहे कि “प्रत्येकवेळी सरकार कर्ज माफी करेल व त्या कर्जाच्या यातनेतून जनता बाहेर पडेल.” पण सत्य असे आहे कि सरकारने अथवा तुमच्या कोणी मित्राने / ओळखीच्या माणसाने दिलेल्या पैश्यातून आज कर्ज फेडले तरी कर्ज करण्याच्या मानसिकते मधून तुम्ही बाहेर पडत नाही. असेच कोठूनतरी पैसे मिळतील आणि माझे कर्ज भागले जाईल या विचारांनी तुम्ही परत कर्ज कराल. मग काय दोन वर्षांनी परत ये रे माझ्या मागल्या.

आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पर्यंत कर्ज नियोजन बाबतीत तुम्ही तुमची मानसिकता सुधारत नाही तो पर्यंत “पूर्ण कर्ज मुक्ती” हा २०१७ चा संकल्प कागदावरच राहील. जर, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा संकल्प करायचा असेल तर कर्ज म्हणजे काय हे समझुन घेणे महत्वाचे आहे. आज १९ डिसेंबर २०१६ रोजी तुमच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि ते २०१७ च्या वर्षी कसं काय संपेल बुवा याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. इथे ठामपणे संगू  इच्छितो कि एका वर्षात, “पूर्ण कर्ज मुक्ती” होणे अशक्य आहे. बघाना जगातील ७ आश्चर्या पैकी एक आश्चर्य म्हणजे आपला “ताज – महाल” जो जगातील ३ रे आश्चर्य आहे. ताज महाल काय एका रात्रीत अथवा एक वर्षात बांधून झाला होता का? नाही. त्याला बरीच वर्ष लागली. पण इथे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि “ताज महाल बांधण्यास खूप वर्ष लागली, याचा अर्थ खूप वर्षांनी तो एक दमात बांधला गेला नाही तर ताज महाल कित्येक वर्ष रोज थोडा थोडा बांधला गेला होता”. म्हणूनच तो पूर्ण झाला.

कर्जमुक्ती बाबतही काही असेच असते. एवढे मोठ्ठ कर्ज कधी फिटणार हा विचार करत राहिलो तर तुम्ही कधीच कर्ज मुक्त होऊ शकत नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, “हे सगळ बरोबर आहे. पण सुरवात कोठून करायची”. यासाठी कर्ज म्हणजे काय व त्याचे प्रकार काय आहेत हे समझुन घेऊ.

कोणतीही वित्त संस्था, बँक त्यांच्या खातेदारांना त्यांच्या गरजेसाठी व्याज आकारून पैसे वापरायला देते त्याला कर्ज असे म्हणतात. इथे तीन गोष्टी खासकरून नमूद करू इच्छितो कि;

१.      हे जे पैसे तुम्हाला मिळतात हे काही खास गरजेपोटी मिळत असतात.
२.      जेवढे दिवस तुम्ही हे पैसे वापरता त्यावर बँक तुम्हाला वापरलेल्या पैश्यावर ठरलेल्या दरा प्रमाणे व्याज आकारत असते.
३.      सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या गरजेपोटी मिळालेले पैसे हे व्याजासकट परत करणे हे बंधनकारक आहे आणि हेच १००% सत्य आहे हे मनावर कोरून ठेवा.
त्यामुळे कर्ज घेतानाच गरज कोणती आहे व त्या गरजेचे महत्व काय आहे हे समजणे उचित ठरेल. चला असं समजू कि खरच तुम्हाला शेती करण्यासाठी कर्जाची गरज आहे. पण थोडं मनाला विचारा, “शेती करण्यासाठी घेतलेले पिक कर्ज कशावर खर्च झालाय”. इथे अनेक प्रकारची उत्तरे मिळतील, याच बरोबर तुम्ही किती बरोबर आहात याचे समर्थन करणारी अनेक कारणे ही समोर येतील. पण याबरोबर, “कर्ज हे व्याजासकट फेडणे बंधनकारक आहे, हे ही ध्यानात राहू दया.”
याचा अर्थ असा नाही कि कर्ज काढायचेच नाही. कर्ज काढून जर त्याचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यातून नक्की नफा होईल. तेव्हा मित्रहो, कर्ज दोन प्रकारची असतात.

१.      चांगले कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन त्यातून तुमच्या खिश्यात पैसे येत असतील तर ते चांगले कर्ज.
उदा: तम्ही जर बँकेमधून १,००,०००/- चे कर्ज ८ % वार्षिक व्याज दराने शेती जोड धंद्यासाठी घेतले तर तुम्हाला वर्षाकाठी मुद्दल सोडून रु. ८०००/- व्याजापोटी द्यावे लागतील. जर तुम्हाला मिळालेले कर्ज व्यवस्थित गुंतवले, शेतीच्या कामासाठी वापरले व त्यातून वर्षाला रु.१२०००/- चा नफा झाला तर रु.८०००/- चे व्याज फेडून रु.४०००/- चा निव्वळ नफा झाला. याला आपण चांगले कर्ज म्हणू.

२.      वाईट कर्ज – म्हणजे जे कर्ज घेऊन तुमच्या खिश्यातून पैसा बाहेर काढत असेल ते वाईट कर्ज
उद: वरील उदाहरणामध्ये जे शेती जोड धंद्यासाठी मिळालेल्या कर्जातून नवीन गाडी घेतली तर नवीन पैसा तयार होणारच नाही व ते कर्ज तुमच एक ओझ होईल. अश्या अनेक प्रकारच्या कर्जाची ओझी तुम्ही तयार करत असता. मग अशी एक वेळ येते कि ते कर्जाचे ओझं म्हणजे डोंगरा एवढे वाटायला लागते. आणि मग कर्ज फेडणे शक्य नाही ही गोष्ट मनात घेऊन त्या कर्जावर तसेच बसून राहतो. पण एक गोष्ट लक्षात राहू दया, “नुसत बसण्याने जे अस्तीत्वातले डोंगरची उंची वाढत नाही; पण कर्जाचा डोंगर नक्कीच वाढत जातो”.
इथे सर्वच काही संपले असे नाही. कर्ज नियोजनाबाबतीत काही आनंदाच्याबाबी पण आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, “कर्ज नियोजणासाठी कोणतीही जादुची कांडी कि कोणतीही यशस्वी समीकरण नाही,” कर्ज नियोजनासाठी थोडा योग्य विचार व कर्ज नियोजनाच्या आराखडा महत्वाचा आहे. चांगले कर्ज नियोजन हे काय मोठ्या शास्त्रज्ञा सारखे मोठे शोध लावणे असे नाही. अगदी आजीच्या पूर्वीच्या पैसे हाताळण्याची पद्धत इतकी सोप्पं आहे. पण जरी सोप्पं वाटत असल तरी बऱ्याच वेळा साधी गोष्ट अवलंबताना खूप त्रास होत असतो. पण मला चांगले माहिती आहे कि, “कर्ज मुक्तीसाठी तुमचे पैश्याच्या व्यवस्थापणाचे विचार चांगले पाहिजेत”. अगदी साधा कर्ज मुक्तीचा आराखडा तयार करणे, विचारपूर्वक व जाणीवपूर्वक त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे होय. त्यातूनच अनेक लोक कर्ज मुक्त झाले आहेत ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे.

तेव्हा मित्रांनो एकदाका, “तुमच्या पूर्ण कर्ज मुक्तीचा” आराखडा तयार झाला कि, “पूर्ण कर्ज मुक्ती” हा फक्त वेळेचाच भाग आहे.  


नोट बंदी व आर्थिक व्यवस्थापण



नमस्कार मंडळी.... मागील काही लेखांमधून तुम्हाला आलेल्या अनुभवावरून तुमचे पैश्याचे विचार कसे बनतात हे पहात आलो आहे. काय योगा योग आहे पहा.... याच दरम्यान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला एक कायम आठवणीत राहणारा अनुभव मिळाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.०० वाजता आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी  ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या. म्हणजे ९ नोव्हेंबर पासून या सर्व नोटा व्यवहारात चालणार नाही असे सांगितले, आणि बऱ्याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मागील १० दिवसांमध्ये खूप चर्चा ऐकायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. गोष्ट आहे ग्रामीण भागातील. एक वयस्कर मावशी, वय साधारण ६०-६५ असेल. परिस्थिती खुपच बेताची. मावशी तशी व्यवहारी. पैसा जापुन ठेवला होता, पण घरी. थोडे थोडे साठवून मावशी कडे तब्बल रु.१,७३,०००/- होते. ते पण ५०० व १००० नोटा मधून. अचानक नोट बंदी मुळे मावशी घाबरली. पण जेव्हा सर्व गोष्टींची कल्पना आली त्यावेळी थोडी स्थिरावली. आपल्या जवळ असलेला / जमा केलेला कष्टाचा पैसा बॅंकेत जमा करून हवं तसा काढता येतो हे समजल्यावर तिने तिचा तो घरी ठेवलेला पैसा काही महिन्यापूर्वी उघडलेल्या जन-धन खात्यात भरून ठाकला व निश्चिंत झाली.

गोष्ट एकदम साधी पण भरपूर काही शिकवून जाते. प्रथम दर्शनी या नोट बंदी निर्णयाचा खुपच त्रास वाटतोय, कारण तुम्ही तुमच्या पूर्वीच्या सवयीचे सध्या गुलाम आहात. बदल हा कोणालाच सहजासहजी नको असतो. याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही तुमच्या Comfort Zone मधून बाहेर पडायला तयार नसता. इथे मावशीला ह्या तिच्याकडच्या नोटा तिच्या हातातून बॅंकेच्या म्हणजे दुसऱ्या हातात देणे जड जात होते. इतके महिने बँकेत खाते असून पैसे बॅंकेत भरले नाही कारण, “त्या सर्व नोटा स्वतःच्या जवळ ठेवण्यात इतक्या वर्ष पासून तयार झालेली मानसिकता व त्यातून मिळणारे समाधान हे होय.” या उदाहरणा प्रमाणे, खूप सारे शेतकरी मित्र शेतमाल विक्रीचा पैसा घरीच ठेवण्यात समाधान मानतात. पण या मधून प्रत्येकाचे खूप मोठे नुकसान होत असते.

निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो. बघा ना.... निसर्ग तुम्हाला असंख्य प्रकारची फळे देतो. नुसतं देत नाही.... तर तुम्हाला ती फळे खाण्यापासून रोखत नाही. पण एक गोष्ट लक्ष्यात घ्या कि या प्रत्येक फळा सोबत तुम्हला बी पण मिळते. निसर्ग चक्र सुरक्षित राहण्यासाठी त्या फळा बरोबर मिळालेले बी जर तम्ही निसर्गात पेरले नाही तर तुम्हाला परत फळे खायला मिळण्याची शक्यता कमी आहे. पैश्याचं ही तसंच गणित असते. मिळालेल्या  पैश्यातून काही पैसा चांगले बीज म्हणून बाजूला काढला पाहिजे. पण वरील गोष्टीमध्ये सांगितलेल्या मावशी प्रमाणे नुसता बाजूला काढून उपयोग नाही तर त्याचे व्यवस्थित बिजारोपण केले पाहिजे. तरच नवीन झाड येईल. ही इतकी साधी गोष्ट माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव अनेक वर्ष करत आला आहे. उदा:- तुमच्या कडे खरीपातील  भाताचे खूपच जुने व उत्तम प्रतीचे वाण आहे. दर वर्षी भात कापणी झाल्यावर सगळ्यातच भाताचे तांदूळ न करता त्यातील काही भाग हा पुढील वर्षीसाठी बीज म्हणून ठेवला जातो. आता हे बीज जर पेरले नाही तर नवीन उगवणार कसे. जर असे प्रत्येक शेतकऱ्याने केले तर बाजारात उत्तम प्रतीचे बीज मिळणार नाही व काही वर्षांनंतर त्या प्रतीचे वाण बाजारातून नष्ट होईल. त्या प्रकारच्या तांदळाचा तुटवडा जाणवावा लागेल. नवीन बीज तयार तरी किती करणार. एका बाजूला कोणीतरी दडपून ठेवल्यामुळे ते बीज खराब होत असते व जे नवीन तयार करणार त्याची प्रत चांगली असेलच याची खात्री नाही.
निसर्ग तुम्हला आम्हाला हे सांगतो कि जे लपून ठेवलेले बीज आहे ते चलनात / वापरात आले पाहिजे. तरच नवीन उत्तम प्रतीचे बीज तयार होईल. तसेच काही गणित अर्थशास्त्र सांगते. अर्थशास्त्राचे जीवनात खूपच महत्व आहे. प्रत्येक वेळी माणसाकडे पैसा आला कि त्याला दोन मार्ग असतात. एक म्हणजे – खर्च करून टाकणे व दुसरा म्हणजे बचत करणे. भाताच्या उत्तम प्रतीच्या वाणा प्रमाणे बीज बाजूला काढून जर ते पेरलेच नाही तर नवीन भात तयार कसा होणार. तसेच बचत केलेला पैसा जर मावशी सारखा घरीच ठेवला तर तो नवीन पैसा कसा तयार करेल. हाच पैसा बँकेत ठेवला, व्यवस्थित गुंतवला तर परतावा मिळेल व पैसा वाढेल. जर हा निसर्गाने सांगितलेला मार्ग तुम्ही पाळला, चांगली बचत करून जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनात जादू होईल. तुम्ही भाताच्या चांगल्या बिजाप्रमाणे पैश्याची काळजी घ्या. बघा पैसे तुमचे एवढी काळजी घेतील कि कळत - नकळत तुम्ही वेगाने श्रीमंतीकडे वाटचाल कराल.

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भलेही काळा पैसा ( म्हणजेत जे भाताचे चांगले वाण जे लोकांनी दाबून ठेवले आहे ) बाहेर काढण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, तरीही मला वाटते कि या निमित्ताने कळत - नकळत तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसाही जो तुमच्यासाठी काम करत नव्हता, तो आता काम करायला लागेल. घरी ठेवलेला पैसा चलनात येईल. प्रत्येक शेतकरी बांधवाने एवढे केले तर देशाबरोबर / तुमच्या जीवनातही अर्थक्रांती घडेल.

नोट बंदीच्या घटनेमुळे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या Money Blueprint (आर्थिक आराखडा) मध्ये एक गोष्ट नक्की कोरली जाईल कि, “जस निसर्गाने दिलेले बीज जर पेरले नाही तर ते खराब होऊन जाईल, तसेच मिळवलेला पैसा जर गुंतवला नाही, चलनात आणला नाही तर तो ही एक ना एक दिवस खराब होईल.”


चलनात न येणाऱ्या पैश्याचे राष्ट्रीय पातळीवर खूप वेगवेगळे तोटे आहेत. या गोष्टी पर्यंत सामान्य माणसाचे विचार ही पोहचत नाही. पण तुमचा स्वतःचा पैसा जरी चलनात नसेल तर त्याचे ही तोटे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही, तुमच्यासाठी तुमच्या जवळ महनतीने साठवलेला ५०० व १००० च्या नोटा चलनात आणा. म्हणजे बँकेत भरा. असे केल्याने तुमचाच फायदा आहे व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी ठरवलेल्या उद्धिष्टां पर्यंत पोहोचण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला.

आर्थिक यशाचा आराखडा लेख ५


आतापर्यंत आपल्या एवढ लक्षात आले आहे कि जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर प्रथम भरपूर पैसे आले पाहिजेत. आणि जर पैशाचा ओघ चांगला हवा असेल तर तुमची पैश्याबाबतची विचार पद्धती व्यवस्थित पाहिजे. ही चांगली अथवा वाईट विचार पद्धती कशी बनते या वर आपण इतके दिवस पहायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय कि, “तुमचा आर्थिक यशाचा आराखडा” कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच.

मागील लेखामध्ये शब्दाच्या अस्त्रामुळे तुमची Money blueprint कशी होते हे पाहीले. याच बरोबर तुम्ही काय पाहता, तुम्हाला काय अनुभव येतात यावर तुमची Money blueprint बनत असते. आयुष्यात प्रत्येक घटना ही तुमच्या मनावर आर्थिक बाबींबाबत काही विचार पक्के करत असते. मग आपण त्याच पद्धतीने वागत असतो.

चला आज, आत्ता, ताबडतोब एक प्रयोग करू. प्रत्येक वाचकाला मी विनंती करतो कि तुम्ही तुमच्या बालपणा मध्ये जा. आता थोडा विचार करा कि, “तुम्ही मोठे होत असताना तुमचे  आई - वडील पैश्याबाबत कसा विचार करत होते.” त्यांची पैश्यासंबंधी आचरण कसं होते. त्यांनी त्यांचा पैसा योग्य प्रमाणे वापरला होता का? त्यांची गुंतवणूकीची पद्धत कशी होती. ते एक चांगले गुंतवणूक दार होते कि अजिबातच गुंतवणूक करत नव्हते. जर गुंतवणूक करण्यात चांगले असतील तर त्यांची गुंतवणूक कश्यामध्ये होती? जमीन, घर, दुकान या प्रकारामध्ये गुंतवणूक केली होती कि त्यांची बँकेमध्ये Fix Deposit होती. अश्या अनेक प्रकारच्या विचारांवर थोडे बारकाईने लक्ष दया. कारण जे काही तुम्ही लहानपणापासून बघत आला असाल, तसेच तुम्ही वागत आहात. कारण तुमची विचार पद्धती तशीच बनली आहे.

प्रत्येक जीवंत प्राणी (त्यात आपण पण आलोच) हा लहानपणापासून अनुकरण करण्यात एकदम पुढे असतो. आपण ज्या गोष्टींचे अनुकरण कसा करता सवय लावून घेतो तसेच आपण घडत असतो. असे नसते तर तुमच्या गावामध्ये एक व्यक्ती, जी धंद्या मध्ये एकदम तरबेज आहे, त्या व्यक्तीची पुढची पिढी ही तशीच झाली नसती.

तात्पर्य असे कि आपण इतर बाबींप्रमाणे, पैशाच्या बाबतीत पण आईवडिलांचे / पालकांचे अनुकरण करत असतो. माझे फायनान्शीयल फिटनेसचे कार्यशाळा होतात. त्यामध्ये मी माझे स्वतःचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी मुळ कोल्हापूरचा. आम्ही लहान असल्यापासून वडिलांचा व्यवसाय होता. लेथ मशीन होते व त्यावर जॉब वर्कचे काम चालू असे. जॉबवर्कच्या कामामध्ये एकदम हाभरवंडा होता. कामगार वर्ग पण एकदम चांगला होता. पण दर ४ वर्षांनी एक मंदी लाट यायची (असे मी ऐकत आलो होतो) म्हणजे काय कि काम कमी होते. मग खर्च भागात नाहीत. मग ज्याच्याकडे scrap माल दयायचा त्याच्याकडून उधारी आणायची. पण एक गोष्ट निश्चित होती कि त्या मंदीच्या काळामध्ये पैश्याची खूपच चण - चण असायची व संपूर्ण घरामध्ये त्रासदायक वातावरण असायचे. जस जस मोठा होत गेलो, शिक्षणासाठी बाहेर पडलो. मुंबई विद्यापीठ येथून MBA पूर्ण केले. चांगली नोकरी लागली. एवढ होऊन सुद्धा मी आर्थिक दुर्बलच राहत होतो. कारण दर महिन्याला आलेला पैसा मी खर्च करून टाकत असे. आलेल्या पैश्याची गुंतवणूक करायची असते हे मी लहानपणापासून कधीच पाहीले नव्हते. मंदीच्या काळात जसे scrap वाल्याकडून उधार आणलेले पाहीले होते तसेच पगाराचे पैसे संपले कि मग पुढच्या महिन्यात देतो अश्या वायदयावर मित्रांकडून उधार घ्यायचो. आणि ह्याचा जणू एक पायंडाच पडला होता. एक दिवस या सर्व गोष्टीमुळे खुपच त्रस्त झालो होतो. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असताना सुद्धा पैश्याच्या बाबतीत मी दुर्लब कसा याचं नेहमी आश्चर्य वाटत होते. सन २००० पासून माझ्या स्वतंत्र व्यवसायामध्ये उतरलो. परत तेच. एवढे पैसे येऊन सुद्धा खिसा नेहमी रिकामाच.

अश्या वेळी माझ्या स्वतःच्या वागण्यावर बारकाईने पाहीले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि पैसे कमावण्याच्या बाबतीत मी वडिलांचे उत्तम अनुकरण करत होतो पण पैसा न गुंतवणे, पैश्याचे नियोजन नीट न करणे या बाबतीत ही वडिलांचे १००% अनुकरण करत होतो. आता चूक कळाली होती. ती सुधारण्यासाठी प्रयत्नशील झालो. मंदीमुळे प्रभावित होणारे व्यवसाय या पासून लांब झालो व गुंतवणूक करायला सुरवात केली.

अश्याप्रकारे जुन्या विचारातून बाहेर पडलो व सतत वाढणाऱ्या उत्पन्नाचा धनी झालो. मित्रांनो तुम्ही जे काही ऐकता, बघता किंवा पैश्याबाबतीत एखादी घटना ही तुम्ही कोण आहात हे ठरवते. मी माझा अनुभव सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वाचकाने थोडे भुतकाळात जाऊन तपासणे  १००% आवश्यक आहे. कदाचित तुमच्या आर्थिक यशाचा आड येणारा कचरा तिथेच अडकला असेल. तो जर सापडला आणि तुमच्या मनातून साफ करून टाकला कि मग तुम्हीपण सतत वाढणाऱ्या उत्पनाचे धनी व्हाल.


Thursday, 17 December 2015

Wednesday, 26 August 2015

Wealth mantras 3# Part 1: Rich people are committed to being rich. Poor people want to be rich.





Ask most people if they want to be rich and they’d look at you as if you were crazy. “Of course I want to be rich,” they’d say. The truth, however, is that most people don’t really want to be rich. Why? Because they have a lot of negative wealth files in their subconscious mind that tell them there is something wrong with being rich. 

At our Financial Fitness workshop, one of the questions we ask people is “What are some of the possible negatives about being rich or trying to get rich?” 

Here’s what some people have to say. See if you can relate to any of these.

“I’ll never know if people like me for myself or for my money.”

“It’s too much work.”

“My friends and family will say, ‘Who do you think you are?’ and criticize me.
As I mentioned earlier, each of us has a wealth file inside the cabinet called our mind. This file contains our personal beliefs that include why being rich would be wonderful. However, for many people, this file also includes information as to why being rich might not be so wonderful. This means they have mixed internal messages about wealth. 

These mixed messages may seem innocent enough, but in reality, they are one of the major reasons most people never become rich.

You can look at it like this.

You “order” what you get by sending energetic messages out to the universe based on your predominant beliefs. Again, based on the Law of Attraction, the universe will do its best to say yes and support you. But if you have mixed messages in your file, the universe can’t understand what you want.

The number one reason most people don’t get what they want is that they don’t know what they want.   

Rich people are totally clear that they want wealth. They are unwavering in their desire. They are fully committed to creating wealth. As long as it’s legal, moral, and ethical, they will do whatever it takes to have wealth. Rich people do not send mixed messages to the universe. Poor people do.

(By the way, when you read that last paragraph, if a little voice inside your head said something to the effect of “Rich people don’t care if it’s legal, moral, or ethical,” you are definitely doing the right thing in reading this book. You’ll soon find out what a detrimental way of thinking that is.)

Wealth principle:
The number one reason most people don’t get what is that they don’t know what they want.

Friday, 21 August 2015

Wealth Mantras # 2 Rich people play the money game to win, Poor people play the money game to not lose.






Poor people play the money game on defense rather than offense. Their primary concern is survival and security instead of creating wealth and abundance.

So, what is your goal? What is your objective? What is your true intention?


The goal of truly rich people is to have massive wealth & abundance. Not just some money, but lots of money. So what is the goal of poor people? To “Have enough to play the bills….? & on time would be a miracle..!”


Middle class people at least go a step further… too bad it’s a tiny step. Their big goal in life also happens to be their favorite word in the whole wide world. They just want to be “comfortable”. I hate to break the news to you, but there’s a huge difference between being comfortable and being rich.


Comfortable is nice. At least you go out to decent restaurant for a change. But pretty much all you could order was chicken. Now, there’s nothing wrong with chicken, if that’s what you really want. But often it’s not. 


In fact, people who are only financially comfortable usually decide on what to eat by looking at the right-hand side of the menu- the price side. “What would you like for dinner tonight, dear?’ “I’ll have this Rs. 250/- dish. Let’s see what it is. Surprise, surprise, it’s the chicken, “for the 3rd time this month!


When you’re comfortable, you don’t allow your eyes to look at the bottom of the menu, for if you did, you might come cross the most forbidden words in the middle-class dictionary: market price! And even if you were curious, you’d never ask what the price actually is. First, because you know you can’t afford it. Second, it’s downright embarrassing when you know the waiter doesn’t believe you when he tells you the dish is Rs.750/- with side dishes extra and you say, “You know what, for some reason, I have a real craving for chicken tonight!”

I have to say that for me personally, one of the best things about being rich is not having to look at the price on the menu anymore. I eat exactly what I want to eat regarding of the price. I can assure you, I didn’t do that when I was broke or comfortable.


It boils down to this: If your goal is to be comfortable, chances are you’ll never get rich. But if you goal is to be rich, chances are you’ll end up mighty comfortable.



Good luck and stay connected for my next blog on wealth file.

 

Wealth Mantras #3 Rich people are committed to being rich. Poor people want to be rich