Sunday 11 December 2016

नकारात्मक विचार खोडा


सर्व प्रथम माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा...नवरात्री हा सण नऊ रात्री आदिशक्तीची आराधना करण्याची आहे. पावसाळा बहुतेक संपलेला आहे, शेतातली पिके तयार होत आलेली आहेत. काही तर तयार झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी मंडळी खुशीत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते व त्या दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भोंडला खेळला जातो. यामध्ये घागर फुंकणे हा एक प्रचलित खेळ. इतकी वर्ष हा खेळ खेळला जातो, पण तो का खेळला जातो यावर आपण कधीच चर्चा करत नाही. थोडे शोधल्यावर असे वाचनात आले कि, “अष्टमीला घागर उदाच्या धुपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात.” ही गोष्ट आपण अनेक वर्ष पाहत आलो आहे व त्याचप्रमाणे अनुकरण ही करीत आलो आहे. पण असे करण्याने श्वसन मार्ग शुद्ध होतो. हे वाचले तेव्हा ही गोष्ट लक्षात आली कि अश्या अनेक गोष्टी आहे ज्या गोष्टी आपण सहजपणे; त्याचा उपयोग काय आहे हे न समझुन घेता स्वीकारतो आणि निसंकोच पणे पुढच्या पिढीला देतो.

अश्याच प्रकारे पैश्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनावर कोरले गेलेले असतात. ते विचार तुमच्यासाठी फायदा देणारे आहेत कि तोटा ह्याचा विचार आपण करत नाही. कारण तो विचार आपल्या पूर्वजांनी/ वरिष्ठांनी दिलेला असतो व तो विचार चुकीचा असूच शकत नाही हे आपण आपल्या मनाला ठामपणे सांगितेले असते. आता या ठकाणी, “आडातच नाही  तर पोहणाऱ्या कुठून येणार” ही म्हण तंतोतन खरी ठरते.

माझ्या मागील लेखामध्ये किंवा माझ्या प्रत्येक व्याखानामध्ये मी नेहमी सांगत असतो कि, “ज्या गोष्टीवर अथवा घटनेवर तुम्ही लक्ष्य केंद्रित करता, ती गोष्ट अथवा घटना तुमच्या मनाप्रमाणे होते. आपण अगदी लहानपणा पासून काचेच्या भिंगाणे काडेपेटी मधील काडी जाळण्याचा खेळ खेळलाच आहे. कोणी हा खेळ खेळला नाही तर नवलच म्हणावे लागेल. आपण हा खेळ खेळताना आपल्या आजूबाजूला वरिष्ठ मंडळींनी सांगितले कि त्या भिंगातून बाहेर पडणारा सूर्यप्रकाश जर काडीचा बिंदू जिथे ज्वलन पदार्थ (sulphar) असतो, त्याठिकाणी केंद्रित झाला नाही तर तो ज्वलन पदार्थ पेट घेणार नाही. यासाठी तुम्हाला हात न हलवता पूर्ण एकाग्र मनाने तुमच्या हातातील भिंगाणे त्या काडीवर सूर्यप्रकाश पाडावा लागेल व ते तुम्ही नक्कीच केले असेल. जरा जरी मन विचलित झाले तरी सुद्धा आपले उद्धिष्ट सध्या होत नाही.

तसेच तुम्ही जर पैसेवाल्या (श्रीमंत) माणसांप्रती मनात घृणा बाळगत असला व त्याच बरोबर “मी चांगला माणूस बनणार आहे” हे म्हणत असाल तर, तुमच्या मनावर “चांगला माणूस कधीही पैसेवाला नसतो, ही गोष्ट बिंबलेली असते.” मग मला सांगा तुमच्याकडे पैसा येईल का? आणि आलाच तर तुमचेच मन तुम्हाला सांगेल कि. “ मला तर चांगला माणूस व्हायचे आहे. त्यामुळे हा पैसा खर्च करून टाकू.” पण आपण आजूबाजूला पाहीले तर आशा अनेक व्यक्ती आहेत कि जे पैसेवाले (श्रीमंत) आहेत आणि चांगले पण आहेत. पण याचा आपण विचार करत नाही कारण असा विचार करायचा असतो हे आपल्याला माहितीच नसते.

असे पैश्याबाद्द्लचे अनेक नकारत्मक विचार हे प्रत्येकाच्या मनात ठासून भरलेले असतात. यालाच मागील लेखात म्हणल्या प्रमाणे programming असे म्हणतात. आता ह्या सर्व पैश्याबाद्द्लच्या नकारत्मक गोष्टी ज्या मनावर कोरल्यागेलेल्या आहेत त्यातूनच विचार येतात. इतकी वर्ष तुमच्या पैश्याबाद्द्लच्या विचाराने तुम्ही कार्य करत आला आहात. आज प्रत्येकाची जी काही आर्थिक स्थिती आहे ही सर्वस्वी त्याने केलेल्या विचारातून झालेल्या कृतीचे फळ आहे.

त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आर्थिक यशापेक्षा चांगले यश हवे असेल, तर तुम्ही जे काही आजपर्यंत करत आहात त्यापेक्षा वेगळी कृती केली पाहिजे. जर वेगळी किंवा लाभदायक कृती करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या फायद्याचे विचार मनामध्ये आले पाहिजेत. पण हे विचार तुमच्या प्रोग्रामिंग मधेच नसतील तर कुठून येणार. बरोबर आहे कि नाही.

अगदी सोप्या भाषेत समझुन घेऊ. समजा तुम्ही तुमच्या आवडत्या एक गाण्याची सिडी बनवून घेतली. पण सिडी बनवताना काहीतरी झाले आणि काही तुमच्या एकदम नावडतीची गाणी त्यामध्ये भरली गेली. प्रत्येक वेळी तुम्ही आवडीची गाणी ऐकण्यासाठी  ती सिडी लावाल, त्या त्या वेळी ती नावडीती गाणी तुम्हाला ऐकावीच लागतील व मन एकदम नाराज होईल. जर ह्या प्रत्येकवेळी ती सिडी बंद करून परत सुरु केली तरी तुम्हाला तेच गाणे परत ऐकावे लागेल. जर ते नावडते गाणे नको असेल तर त्या सीडीच्या आतमध्ये जाऊन ते गाणे Delete अथवा खोडून टाकावे लागेल.

आपल्या आयुष्य ही असेच आहे. जर पैश्याबाद्द्लची नकारत्मक भावना तुमच्या मनावर कोरली गेली असेल तर ती तुमच्या आयुष्यातील आर्थिक प्रगतीला बाधक आहे. त्यामुळे हे सर्व नकारत्मक विचार मनामध्ये जाऊन खोडून टाकले पाहिजेत. वरील सीडीच्या उदाहरणा मध्ये तुम्हाला हे माहिती होते कि ते नावडते गाणे कोणी व कोठे भरले होते. त्यामुळे ते नावडते गाणे त्या सिडी मधून काढून टाकणे एकदम सोपं झाले होते. तसेच तुमच्या मनामधील पैश्याबाद्द्लचा उगम कोठे झाला हे पाहणे आवश्यक ठरेल. त्या विचारांची सवय कशी लागली हे पाहणे बंधनकारक ठरेल. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती खालील तीन प्रकारांमुळे त्याची विचारसरणी घडवत वा बिघडवत असतो.

१.     ऐकणे – तुम्ही लहानपणापासून पैश्याबद्दल काय ऐकत आला आहात?
२.     बघणे – पैश्याच्या अवती भवती तुम्ही काय काय बघितले आहे?
३.     घटना – पैसा केंद्रित तुमच्या आयुष्यात कोणत्या घटना घडल्या आहेत.

वरील तिन्ही गोष्टी तुमच्या सध्याच्या विचारसरणीला कारणीभूत आहेत. तेव्हा सिडी प्रमाणे या तिन्ही गोष्टी काय आहेत हे बघून त्यातील नावडती गाणी खोडून टाकणेच बरोबर ठरेल. एकदाच ही  पैश्यांच्या प्रती (नावडती गाणी) नकारत्मक विचार खोडून टाकेल कि मग आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल.


तेव्हा मित्रा हो, वरील तिन्ही गोष्टीकडे कसे पहायचे व त्यामधून कोणते विचार खोडून टाकायचे ते आपण पुढील लेखामध्ये सविस्तर पाहूया. तो पर्यंत नवरात्री साजरी करूया, दसऱ्या दिवशी अपराजिता देवीची मनामध्ये स्थापना करूया. तिला प्रार्थना करूया कि मला आर्थिक बाबींचा विजयी कर..

1 comment: